शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

अवकाळी पावसाचा ६३ हजार हेक्टर क्षेत्राला फटका! ८३२ गावांमध्ये झाले नुकसान 

By रवी दामोदर | Updated: December 9, 2023 17:42 IST

अकोला जिल्ह्यात दि. २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान अवकाळी पावसाने थैमान घातले.

अकोला : जिल्ह्यात दि. २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान अवकाळी पावसाने थैमान घातले. अवकाळी पावसामुळे खरीप हंगामासह रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू असून, सात तालुक्यात ६३ हजार ८६१ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात संयुक्त पंचनामे सुरू असून त्यानंतर अंतिम प्रस्ताव शासनाला मदतीसाठी पाठविण्यात येणार आहे.

यंदा मान्सून विलंबाने दाखल झाल्याने खरीप हंगामात पेरण्या उशिराने झाल्या. त्यात शेतात पीक बहरलेले असताना तब्बल दीड महिना पावसाने खंड दिल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व मदार रब्बी हंगामावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने पेरणी केली, परंतु दि. २६ नोव्हेंबरच्या रात्रीपासून जिल्ह्यात सलग पाच दिवस अवकाळीने धुमाकूळ घातला. अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील तूर, कापसासह हरभऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. अनेक भागांत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. दुसरीकडे सकाळच्या धुक्यामुळे तुरीला फटका बसला आहे. प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यात दि.२६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर कालावधीत सातही तालुक्यात ६३ हजार ८६१ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाले आहे. सध्या जिल्ह्यात पंचनामे सुरूच असून, अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे. सातही तालुक्यात नुकसानजिल्हा प्रशासनानुसार सुरुवातीला केवळ तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी व अकोला तालुक्यात नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला होता. परंतु आता अकोट, मूर्तिजापूर व बाळापूर तालुक्यातसुद्धा नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. ८३२ गावांना बसला फटकाअवकाळी पावसामुळे जिल्ह्यात खरीप हंगामासह रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अवकाळीचा जिल्ह्यातील तब्बल ८३२ गावांना फटका बसला आहे. त्यामध्ये  अकोला तालुक्यातील  ३५ गावे,  बार्शीटाकळी तालुक्यातील १६० गावे, मूर्तिजापूर तालुक्यातील १६६ गावे, अकोट तालुक्यातील १८६ गावे, तेल्हारा तालुक्यातील ७८ गावे, बाळापूर तालुक्यातील ११३ गावे, पातूर तालुक्यातील ९४ गावांचा समावेश आहे. 

टॅग्स :Akolaअकोला