शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट

By admin | Updated: March 1, 2016 01:34 IST

गहू, हरभरा, संत्री, डाळिंब, केळी पिकांची नासाडी.

अकोला: जिल्ह्यात रविवारी रात्री गारपीट व अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. प्रामुख्याने रब्बी ज्वारी, मका, गहू, हरभरा, सूर्यफूल या पिकांसह फळबागांना सर्वाधिक फटका बसला. बहुतांश गावांमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेकांना रात्र अंधारात काढावी लागली. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटले. त्यामुळे शेतकर्‍यांनी रब्बी हंगामासाठी कंबर कसली; मात्र अकोला, मूर्तिजापूर, बाश्रीटाकाळी, पातूर तालुक्यांमध्ये शनिवारी रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रब्बी गहू, ज्वारी, हरभरा व फळबागांचे नुकसान झाले. काही गावांमध्ये गव्हाचे पीक जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले. काही ठिकाणी उत्पादनावर परिणाम होणार नसला तरी दाण्याच्या दर्जावर पावसाचा परिणाम होणार असल्याचे कृषितज्ज्ञांचे मत आहे. दोनद व कानशिवणी परिसरात पाऊस झाला. यामुळे पिकाला कमी बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने तातडीने पावले उचलून नुकसानभरपाईचा निर्णय घ्यावा व शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. बाश्रीटाकळी तालुक्यात गारपीट; २५0 हेक्टरवरील पिकांचे नुकसानबाश्रीटाकळी तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसाचा २५0 हेक्टरवरील पिकांना फटका बसला. वादळी वार्‍यासह पाऊस झाला तसेच लिंबाएवढय़ा गारा पडल्या. त्यामुळे महागाव, मांगूळ, मिर्झापूर, दगडपारवा, रेडवा, काजळेश्‍वर, पुनोती बु., पुनोती खु. परिसरातील पिकांची नासाडी झाली. काही घरांवरील टिनपत्रे उडाली. रब्बी गहू, हरभरा, कांदा ही पिके जमीनदोस्त झाली. २0 मिनिटांपर्यंत गारांचा वर्षाव झाला. जवळपास दीड तास जोरदार पाऊस झाला. महागावात घरावरील कौले फुटली. रेडवा गावातही गारा पडल्या. अनेक गावांमध्ये पाने गळून झाडे निष्पर्ण झाली. नुकसानाचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे तहसील कार्यालयाने कळविले आहे.