शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट

By admin | Updated: March 1, 2016 01:34 IST

गहू, हरभरा, संत्री, डाळिंब, केळी पिकांची नासाडी.

अकोला: जिल्ह्यात रविवारी रात्री गारपीट व अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. प्रामुख्याने रब्बी ज्वारी, मका, गहू, हरभरा, सूर्यफूल या पिकांसह फळबागांना सर्वाधिक फटका बसला. बहुतांश गावांमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेकांना रात्र अंधारात काढावी लागली. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटले. त्यामुळे शेतकर्‍यांनी रब्बी हंगामासाठी कंबर कसली; मात्र अकोला, मूर्तिजापूर, बाश्रीटाकाळी, पातूर तालुक्यांमध्ये शनिवारी रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रब्बी गहू, ज्वारी, हरभरा व फळबागांचे नुकसान झाले. काही गावांमध्ये गव्हाचे पीक जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले. काही ठिकाणी उत्पादनावर परिणाम होणार नसला तरी दाण्याच्या दर्जावर पावसाचा परिणाम होणार असल्याचे कृषितज्ज्ञांचे मत आहे. दोनद व कानशिवणी परिसरात पाऊस झाला. यामुळे पिकाला कमी बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने तातडीने पावले उचलून नुकसानभरपाईचा निर्णय घ्यावा व शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. बाश्रीटाकळी तालुक्यात गारपीट; २५0 हेक्टरवरील पिकांचे नुकसानबाश्रीटाकळी तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसाचा २५0 हेक्टरवरील पिकांना फटका बसला. वादळी वार्‍यासह पाऊस झाला तसेच लिंबाएवढय़ा गारा पडल्या. त्यामुळे महागाव, मांगूळ, मिर्झापूर, दगडपारवा, रेडवा, काजळेश्‍वर, पुनोती बु., पुनोती खु. परिसरातील पिकांची नासाडी झाली. काही घरांवरील टिनपत्रे उडाली. रब्बी गहू, हरभरा, कांदा ही पिके जमीनदोस्त झाली. २0 मिनिटांपर्यंत गारांचा वर्षाव झाला. जवळपास दीड तास जोरदार पाऊस झाला. महागावात घरावरील कौले फुटली. रेडवा गावातही गारा पडल्या. अनेक गावांमध्ये पाने गळून झाडे निष्पर्ण झाली. नुकसानाचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे तहसील कार्यालयाने कळविले आहे.