शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सोमवारपासून अनलॉक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST

कोविडच्या दुसऱ्या लाटेत जिल्हा माेठ्या प्रमाणात प्रभावित झाला. एप्रिल, मे महिन्यात कोरोनाचा सर्वाधिक कहर झाल्याचे दिसून आले. मात्र, मे ...

कोविडच्या दुसऱ्या लाटेत जिल्हा माेठ्या प्रमाणात प्रभावित झाला. एप्रिल, मे महिन्यात कोरोनाचा सर्वाधिक कहर झाल्याचे दिसून आले. मात्र, मे महिन्याच्या अखेरीस रुग्णसंख्या वाढीचा वेग कमालीचा कमी झाला. रुग्णालयात दाखल ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही लक्षणीय घटल्याने, ५० टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजन खाटा रिक्त झाल्या. दरम्यान, शासनाने पाच टप्प्यांत अनलॉकचे नियोजन केले. त्यासाठी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन खाटांचे निकष लावण्यात आले. या निकषानुसार, अकोला जिल्हा तिसऱ्या टप्प्यात मोडत असून, सोमवारपासून जिल्ह्यात अनलॉकला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अकोलेकरांना विशेषत: व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या प्रतिष्ठानांसोबतच इतरही प्रतिष्ठाने दुपारी ४ वाजतापर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी मिळणार आहे, तसेच वीकेंडला औषधांच्या प्रतिष्ठाने वगळून उर्वरित संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे.

जिल्ह्याचा सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट - ७.२४

सध्या ऑक्सिजन खाटांवर असलेले रुग्ण ७६८ (४४.६७)

एकूण पॉझिटिव्ह - ५६,५११

एकूण मृत्यू - १,१०१

डिस्चार्ज - ५२,३७४

ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण - ३,०३६

काय सुरू राहील

अत्यावश्यक दुकाने, अत्यावश्यक नसलेली दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.

रेस्टॉरंट दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने चालू राहतील. त्यानंतर, घरपोच सेवा सुरू राहील.

जीम, सलून, ब्यूटी पार्लर ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहील. एसी बंद ठेवूनच चालू राहतील.

सार्वजनिक मैदाने, आउटडोर गेम्ससाठी दरदिवशी ५ ते ९ वाजेपर्यंत परवानगी.

खासगी कार्यालये ५० टक्के उपस्थितीत दुपारी ४ वाजतापर्यंत चालू राहतील.

अंत्ययात्रेस २० जणांची उपस्थिती असेल.

सांस्कृतिक कार्यक्रम, लग्नसमारंभ ५० टक्के उपस्थितीत केवळ सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत करता येतील.

स्थानिक बैठका, निवडणूक कार्यक्रम ५० टक्के उपस्थितीत करता येतील.

सार्वजनिक प्रवास, आंतरजिल्हा प्रवास या गोष्टी नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

हे बंद राहील

मॉल, थिएटर्स, नाट्यगृह बंद राहतील.

वीकेंडला संपूर्ण बाजारपेठ बंद राहील.

अकोला जिल्हा तिसऱ्या टप्प्यात मोडताे. त्यानुसार, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनानुसार आदेश पारीत केला आहे. त्याचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे.

- प्रा.संजय खडसे