शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

अस्वस्थतेतून निर्मित साहित्य चिरंतन - डहाके

By admin | Updated: January 26, 2016 02:30 IST

तुका म्हणे साहित्य पुरस्काराचे थाटात वितरण

बुलडाणा : अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुक्त संचाराव्दारे मानवी अस्वस्थेतून तयार होणारी साहित्यकृती कालातीत व चिरंतन ठरत असते. अशा साहित्यकृतीला पुरस्कृत करणे सजक व समंजस समाजाचे कर्तव्य असते. पुरस्कारामुळे लेखकाला आनंद मिळून त्याचे नाव नवलेखन निर्माणासाठीचे मनोबल वाढत असते. पुरस्कार लेखकाला नको ते लेखण करण्यासाठी उर्जा पुरविण्याची महत्वपुर्ण कामगिरी करीत असतात, असे विचार वसंत आबाजी डहाके यांनी भगवान ठग तुका म्हणे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना मांडले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द शायर तथा संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.गणेश गायकवाड तर औरंगाबादचे कवी, पत्रकार डी.बी.जगत्पुरीया, कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर, संयोजीका वैशाली भगवान ठग-जाधव व पुरस्कारप्राप्त साहित्यिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रारंभी अध्यक्ष तथा अतिथींनी अनुवादक, कवी, समीक्षक, भगवान ठग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलनाने उद्घाटन करून अतिथींचे स्वागत ङ्म्रीमती पार्वतीबाई ठग, वैशाली ठग-जाधव, ङ्म्रीराम जाधव यांनी केल्यानंतर संयोजिका वैशाली ठग यांनी भगवान ठग तुका म्हणो राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार तथा कार्यक्रमाव्दारे भुमिका प्रास्ताविकाव्दारे विषद केली. प्रमुख अतिथी तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्याहस्ते पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सन्मानित साहित्यिकांनी सत्काराप्रित्यर्थ कृतज्ञता भाव म्हणून मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना.रविकांत तुपकर व साहित्यिक सुरेश साबळे यांचा सत्कार करण्यात आला.