शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

अस्वस्थतेतून निर्मित साहित्य चिरंतन - डहाके

By admin | Updated: January 26, 2016 02:30 IST

तुका म्हणे साहित्य पुरस्काराचे थाटात वितरण

बुलडाणा : अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुक्त संचाराव्दारे मानवी अस्वस्थेतून तयार होणारी साहित्यकृती कालातीत व चिरंतन ठरत असते. अशा साहित्यकृतीला पुरस्कृत करणे सजक व समंजस समाजाचे कर्तव्य असते. पुरस्कारामुळे लेखकाला आनंद मिळून त्याचे नाव नवलेखन निर्माणासाठीचे मनोबल वाढत असते. पुरस्कार लेखकाला नको ते लेखण करण्यासाठी उर्जा पुरविण्याची महत्वपुर्ण कामगिरी करीत असतात, असे विचार वसंत आबाजी डहाके यांनी भगवान ठग तुका म्हणे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना मांडले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द शायर तथा संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.गणेश गायकवाड तर औरंगाबादचे कवी, पत्रकार डी.बी.जगत्पुरीया, कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर, संयोजीका वैशाली भगवान ठग-जाधव व पुरस्कारप्राप्त साहित्यिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रारंभी अध्यक्ष तथा अतिथींनी अनुवादक, कवी, समीक्षक, भगवान ठग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलनाने उद्घाटन करून अतिथींचे स्वागत ङ्म्रीमती पार्वतीबाई ठग, वैशाली ठग-जाधव, ङ्म्रीराम जाधव यांनी केल्यानंतर संयोजिका वैशाली ठग यांनी भगवान ठग तुका म्हणो राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार तथा कार्यक्रमाव्दारे भुमिका प्रास्ताविकाव्दारे विषद केली. प्रमुख अतिथी तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्याहस्ते पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सन्मानित साहित्यिकांनी सत्काराप्रित्यर्थ कृतज्ञता भाव म्हणून मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना.रविकांत तुपकर व साहित्यिक सुरेश साबळे यांचा सत्कार करण्यात आला.