शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

अघोषित भारनियमनाने शेतकरी त्रस्त

By admin | Updated: August 21, 2014 19:38 IST

बोरगाव वैराळे परिसरात कालपासून अघोषित भारनियमनाने नागरिक त्रस्त झाले आहेत.

बोरगाव वैराळे : बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे परिसरात कालपासून अघोषित भारनियमनाने नागरिक त्रस्त झाले आहेत. सतत १० तासापासून वीज नसल्याने गावकर्‍यांच्या नाकीनऊ आले आहेत. या परिसरातील बोरगाव वैराळे, सोनाळा, दुधाळा, हातरू ण, मंडाळा, लोणाग्रा, खांबोरा या भागात केंव्हाही वीज पुरवठा खंडित होतो. एकदा गेलेली वीज पुन्हा कधी येईल, याची काहीच श्वाश्वती नसल्याने गावकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पंधरा दिवसांपासून श्रावणसरी या भागात बसरलेल्याच नाहीत. त्यामुळे कोरडवाहू शेतकरी आधीच हतबल झाले आहेत. हातरू ण परिसरातील ओलिताचे साधन असलेले शेतकरी पिके जगविण्यासाठी रात्रीचा दिवस करीत असले तरी विविध कारणे समोर ठेवून महावितरणकडून अघोषित भारनियमन केले जात आहे. त्यामुळे पाणी असतानाही हतबल होण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. ब्रेकडाऊन, इमर्जन्सी, जम्परफाल्ट आदी शब्दाचा वापर करून लाईनमन ते अभियंता शेतकर्‍यांना समजावत आहे. मात्र रोज हे शब्द ऐकून शेतकरी आता त्रस्त झाला आहे. कर्मचारी कमी आणि रोहित्र जास्त अशी अवस्था असल्याने आता भ्रमणध्वनी उचलण्यासही टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे.भारनियमनाच्या वेळेव्यतिरिक्त हे भारनियमन सुरू राहत असल्याने शेतकर्‍यांच्या संतापाच्या उद्रेकाला वीज वितरण कंपनीला समोरे जावे लागत आहे. वीज खंडित झाल्यानंतर पिठगिरण्या बंद पडतात. त्यामुळे बाहेरगावावरू न दळण दळून आणावे लागते. ग्रामीण भागातील भारनियमन कमी करावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत असली तरी वीज वितरण अधिकारी याला काहीच प्रतिसाद देत नसल्याने गावकर्‍यांनी न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)