शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

अघोषित भारनियमन, कृषी पंपांचा वीज पुरवठाही विस्कळीत

By admin | Updated: October 7, 2014 01:57 IST

अकोला जिल्ह्याचे चित्र, मात्र विक्रमी वीज पुरवठा केल्याचा महावितरणचा दावा.

अकोला : गत पंधरा दिवसांपासून राज्यात अघोषित भारनियमन करण्यात येत आहे. कृषी पंपांचा वीज पुरवठा तासन्तास बंद असतो. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असताना, महावितरण मात्र ३६४.५७ लाख युनिटचा वीज पुरवठा करून विक्रम केल्याची बतावणी करीत आहे.महावितरणने ५ ऑक्टोबर २0१४ रोजी तब्बल ३६४.५७ दशलक्ष युनिट वीज पुरवठा करण्याचा विक्रम केला. २९ सप्टेंबर २0१४ रोजी महावितरणने ३६२ दशलक्ष युनिट वीज पुरविली होती. १ ऑक्टोबर २0१४ पासून महावितरणने दसरा वगळता रोज १६000 मेगावॅटपेक्षा जास्त वीज पुरविलेली आहे. गत पंधरा दिवसांपासून राज्यात मोठय़ा प्रमाणात भारनियमन करण्यात येत आहे. भारनियमनाने जनता त्रस्त झाली आहे. सध्या पाऊस नसल्यामुळे पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. पिकांना पाण्याची नितांत गरज असताना, अतिरिक्त भारनियमनामुळे कृषिपंपांना तासन्तास वीज मिळत नाही. अनेक शेतांमध्ये सिंचनाची सोय आहे; मात्र भारनियमनामुळे पाणी असल्यावरही शेतकरी सिंचन करू शकत नाही. परिणामी त्रस्त झालेले शेतकरी महावितरणच्या कार्यालयावर धडक देत आहेत. गत आठ दिवसात एकट्या अकोला जिल्ह्यातील दहा ते पंधरा गावातील शेतकर्‍यांनी महावितरणकडे भारनियमन बंद करण्याची मागणी केली. त्यासाठी काही कार्यालयांमध्ये तोडफोडही झाली आहे. दिनांक            विजेची मागणी              वीज पुरवठा                      भारनियमन ५-१0-१४                १७,१२३ मे.वॅ.              १६,७0५ मे.वॅ.                ४१८ मे.वॅ.४-१0-१४                १७,६९४ मे.वॅ.              १६,७२१ मे.वॅ.                ९७३ मे.वॅ.३-१0-१४                १५,१५९ मे.वॅ.              १५,0१८ मे.वॅ.                 १४१ मे.वॅ.२-१0-१४                १६,२0४ मे.वॅ.              १६,0९९ मे.वॅ.                 १0५ मे.वॅ.१-१0-१४                १६,८१३ मे.वॅ.               १६,२७८ मे.वॅ.                 ५३५ मे.वॅ.