शहरं
Join us  
Trending Stories
1
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
2
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि यहुदींवरही परिणाम
3
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
4
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
5
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
6
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
7
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
8
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
9
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
10
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
11
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
12
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
13
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
14
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
15
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
16
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
17
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
18
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
19
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
20
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत

अकोला जिल्ह्यातील ३७ गावांना अशुद्ध पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 10:26 IST

जिल्ह्यातील ३७ गावांमध्ये ब्लिचिंग पावडरचा उपयोग न करता पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यातून आजार पसरण्याचे प्रमाण जास्त असते. अशातच जिल्ह्यातील ३७ गावांमध्ये ब्लिचिंग पावडरचा उपयोग न करता पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात असून, आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.सध्या पावसाळा असल्याने दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या दिवसात पाणी उकळून पिण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जातो; मात्र जिल्ह्यातील ३७ गावांमध्ये ब्लिचिंग पावडरशिवाय पाणी पुरवठा होत असल्याचे जुलै महिन्याच्या अहवालातून समोर आले आहे. जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना दूषित पाण्यातून होणाºया आजारांपासून संरक्षण मिळावे, तसेच ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे, याअनुषंगाने आरोग्य विभागातर्फे तपासणी केली जाते. त्या अनुषंगाने वॉटर गार्ड पाण्याचे नमुने गोळा करून प्रयोग शाळेमार्फत त्यांची तपासणी केली जाते.जुलै महिन्यात मिळालेल्या अहवालानुसार २८ ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या ३७ गावांमध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर न करता पाणी पुरवठा होत असल्याचे निष्पन्न झाले.यामध्ये अकोला व बाळापूर तालुक्यातील सर्वाधिक गावांचा समावेश आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात होत असलेला दूषित पाणीपुरवठा ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater transportजलवाहतूक