शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

ॲन्टिबायोटिक्सचा असंतुलित वापर; कसा होईल आजार बरा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:21 IST

अकोला : सद्य:स्थितीत व्हायरल तापीच्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहे. अनेकांना डेंग्यू, मलेरियाची लक्षणेही दिसून येत आहेत. यातील बहुतांश ...

अकोला : सद्य:स्थितीत व्हायरल तापीच्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहे. अनेकांना डेंग्यू, मलेरियाची लक्षणेही दिसून येत आहेत. यातील बहुतांश रुग्ण सुरुवातीला डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी घेतात. मात्र, ॲन्टिबायोटिक्सच्या असंतुलित वापरामुळे रुग्णाचा आजार लवकर बरा होत नसल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे किरकोळ आजार असला, तरी रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधी घ्यावी, असा सल्लादेखील तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत.

साधारणत: बॅक्टेरिया, फंगसमुळे इन्फेक्शन होत असून, त्याविरोधात ॲन्टिबायोटिक्सचा वापर केला जातो. अशा आजारांसाठी डॉक्टरही रुग्णांना ॲन्टिबायोटिक्स औषधी देतात. ही औषधी देताना डॉक्टर रुग्णांना विशिष्ट डोस देतात. मात्र, बहुतांश रुग्ण डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्रेत्यांकडून ॲन्टिबायोटिक्स औषध घेतात. रुग्णाला सुरुवातीलाच जास्त प्रमाणात ॲन्टिबायोटिक्स दिल्या गेल्यास पुढच्या वेळी त्याच आजारासाठी ॲन्टिबायोटिक्सचे प्रमाण आणखी वाढविण्याची शक्यता असते. अन्यथा रुग्णाचा आजार ॲन्टिबायोटिक्सला प्रतिसाद देत नाही. त्यामुळे ॲन्टिबायोटिक्स घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टर करतात.

असे होतात परिणाम

सेंसेटिव्ह - ॲन्टिबायोटिक्सचा ठराविक डोस दिल्यावर रुग्ण बरा झाल्यास तो डोस रुग्णासाठी सेंसेटिव्ह ठरतो. त्यामुळे रुग्णावर कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. रुग्ण दुसऱ्यांदा आजारी पडल्यास डॉक्टर त्याच प्रमाणात किंवा कमी- अधिक प्रमाणात रुग्णाला ॲन्टिबायोटिक्सचा डोस देऊन रुग्णावर यशस्वी उपचार करू शकतात. कल्चर सेंसेटिव्हिटी टेस्ट केल्यानंतरच रुग्णाच्या आजाराचे योग्य निदान होते. त्यानुसार डाॅक्टर औषधोपचार करतात.

रेजिस्टन्स - रुग्णाला दिलेला ॲन्टिबायोटिक्सचा डोस त्याला सूट होत नसेल, तर त्याला रेजिस्टन्स म्हटले जाते. त्यामुळे डॉक्टर डोस बदलून देतात.

रुग्णांमध्ये वाढतेय ‘एमडीआर’चे प्रमाण

मल्टी ड्रग रेजिस्टन्स बॅक्टेरिया (एमडीआर) चे इन्फेक्शन झाल्यास कितीही ॲन्टिबायोटिक्स दिल्यास रुग्ण त्याला प्रतिसाद देत नाही. ही स्थिती ॲन्टिबायोटिक्सच्या असंतुलित वापरामुळे उद्भवली आहे. गत काही वर्षांत रुग्णांमध्ये ‘एमडीआर’चे प्रमाण वाढत असल्याचेही तज्ज्ञ सांगतात.

डॉक्टरांचा सल्ला आवश्यक

साधा व्हायरल फिव्हर असेल, तर तीन दिवसांत रुग्ण बरा होतो. मात्र, रुग्ण बरा न झाल्यास औषधांची गरज पडते. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. डॉक्टर वजनानुसार रुग्णांना बॅक्टेरियाचा डोस देत असल्याने रुग्णावर त्याचे विपरीत परिणाम होत नाहीत.

किडनी, लिव्हरला धोका

शरीरातील अनावश्यक वस्तू बाहेर काढण्याचे प्रमुख काम किडनी आणि लिव्हर करतात. ॲन्टिबायोटिक्स घेतल्यानंतर त्यातील अनावश्यक घटक प्रामुख्याने किडनीमार्फतच बाहेर पडतात. ॲन्टिबायोटिक्स १२ ते २४ तास शरीरात राहतात. त्यामुळे या औषधांचा अनावश्यक वापर झाल्यास त्याचा किडनी आणि लिव्हरवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

विषाणू नेहमीच आपले स्वरूप बदलतात. त्यानुसार त्यांच्यावर औषधोपचार करावा लागतो. मात्र, अनेक जण डॉक्टरांचा सल्ला न घेताच गरजेपेक्षा जास्त ॲन्टिबायोटिक्सचा डोस घेतात. रुग्णाच्या शरीरासाठी हा प्रकार घातक ठरू शकतो. आजाराचे योग्य निदान करणे गरजेचे असून त्यासाठी रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

- डॉ. सागर थोटे, फुप्फुस रोगतज्ज्ञ, अकोला