शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

समाजकल्याणच्या आणखी दोन योजना मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:28 IST

अकोला : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या १ कोटी ९३ लाख रुपयांच्या योजनांसोबतच आणखी ४९ लाख रुपयांच्या खर्चातून दोन योजना राबवण्यास बुधवारी झालेल्या समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार रोटाव्हेटर आणि टिनपत्र्यांसाठी १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे निश्‍चित केल्याचे सभापती रेखा देवानंद अंभोरे यांनी सांगितले. 

ठळक मुद्देदलित वस्ती कामांचे पुन्हा नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या १ कोटी ९३ लाख रुपयांच्या योजनांसोबतच आणखी ४९ लाख रुपयांच्या खर्चातून दोन योजना राबवण्यास बुधवारी झालेल्या समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार रोटाव्हेटर आणि टिनपत्र्यांसाठी १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे निश्‍चित केल्याचे सभापती रेखा देवानंद अंभोरे यांनी सांगितले.  समाजकल्याण विभागाकडून लाभार्थींच्या योजना गेल्या दोन वर्षांत रखडल्या. त्यामुळे गेल्यावर्षी निवड झाल्यानंतरही लाभार्थींना वस्तूंचे वाटप झाले नाही. चालू वर्षी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांना लाभ कोणत्याही परिस्थितीत मिळणे आवश्यक आहे. तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळालेल्या योजनांसाठी लाभार्थी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामध्ये लाभार्थींना एचडीपीई पाइप, प्लास्टिक ताडपत्री, पेट्रोकेरोसिन पंप, डीझल पंप, इलेक्ट्रिक पंप, पीव्हीसी पाइप, दिव्यांग लाभार्थींना पिठाची गिरणी, तीनचाकी सायकल, झेरॉक्स मशीनचा पुरवठा करण्याच्या योजनांचा समावेश आहे. या सर्व योजनांसाठी १ कोटी ९३ लाख रुपये खर्च होणार आहेत. त्यासोबतच मंजुरी प्रक्रियेत असलेल्या २0 लाख रुपये निधीतून टिनपत्रे, तर २९ लाख रुपयांतून रोटाव्हेटर वाटप योजनेला मंजुरी मिळाली. त्या योजनांसाठी १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत समितीच्या सभेत बुधवारी देण्यात आली. सोबतच ग्रंथालयांमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके देणे, दिव्यांगांसाठी शाळांमध्ये शौचालय, प्रसाधनगृहांची निर्मिती करणे, रॅम्प निर्मिती करण्याचेही नियोजन करण्यात आले. सभेला सदस्य सम्राट डोंगरदिवे, सरला मेश्राम, श्रीकांत खोणे, बाळकृष्ण बोंद्रे, रूपाली अढाऊ, मंजुळा लंगोटे, पद्मा भोसले यांच्यासह प्रभारी समाजकल्याण अधिकारी जवादे उपस्थित होते. 

दलित वस्ती कामांचे पुन्हा नियोजनजिल्हय़ातील शेकडो गावांमध्ये दलित वस्ती विकास कामांचा निधी वाटप करताना अनेक गावांतील गरजू वस्त्या वंचित आहेत. त्या वस्त्यांमध्ये विकास कामे करण्यास प्राधान्य देत कामांचे पुन्हा नियोजन करण्याचा ठराव घेण्यात आला. त्यानुसार लवकरच नियोजन केल्या जाणार आहे.