शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

वीज कोसळून दोन ठार; आसेगाव व पांगरीत शोककळा

By admin | Updated: April 11, 2015 01:46 IST

रोजी मालेगाव व रिसोड तालुक्यात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला.

वाशिम/मालेगाव : जिल्ह्यात १0 एप्रिल रोजी मालेगाव व रिसोड तालुक्यात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. यादरम्यान मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे व रिसोड तालुक्यातील आसेगाव येथील दोन जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. तालुक्यातील पांगरी नवघरे येथील १७ वर्षीय विठ्ठल माधव तागड हा अकराव्या वर्गात शिकणारा युवक शेतात बकर्‍या चारत असताना विज अंगावर कोसळल्याने जागीच ठार झाला. ही घटना दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. इतर दोघे जण जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अकोला येथे उपचारार्थ पाठविण्यात आले. पांगरी नवघरेच्या उत्तरेकडे असलेल्या धरणाच्या बाजूच्या शेतामध्ये विठ्ठल तागड, विष्णू नवघरे आणि वामन तुकाराम नवघरे हे बकर्‍या चारण्यासाठी गेले होते. दुपारी साडे ३ वाजताच्या सुमारास अचानक वादळी वारे व विजांच्या कडकडाटात पाऊस सुरू झाला. त्यामध्ये वीज अंगावर कोसळल्याने विठ्ठल तागड हा जागीच ठार झाला, तर विष्णू नवघरे (४0)े गंभीर जखमी झाले. वामन नवघरे (४५) हे किरकोळ जखमी झाले. जखमी विष्णू नवघरे यांना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले, तर वामन नवघरे यांच्यावर मालेगाव येथील एका खासगी दवाखान्यामध्ये उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्याला घरी पाठविण्यात आले आहे. या घटनेमध्ये त्यांच्याकडील चार बकर्‍यासुद्धा ठार झाल्या आहेत. पुढील तपास ठाणेदार तट याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. अन्य एका घटनेत रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील १६ वर्षीय रामा लोणकर या अकराव्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्यांवर वीज कोसळली. त्यामध्ये तो ठार झाल्याची घटना १0 एप्रिलला ५.३0 वाजता घडली. गावानजीक असलेल्या शेतातून तो घरी परत येत होता. वाटेतच विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्याने गावाकडे येण्यास सुरुवात करतानाच त्याच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये त्याचा तेथेच मृत्यू झाला.