शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळून दोन ठार; आसेगाव व पांगरीत शोककळा

By admin | Updated: April 11, 2015 01:46 IST

रोजी मालेगाव व रिसोड तालुक्यात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला.

वाशिम/मालेगाव : जिल्ह्यात १0 एप्रिल रोजी मालेगाव व रिसोड तालुक्यात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. यादरम्यान मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे व रिसोड तालुक्यातील आसेगाव येथील दोन जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. तालुक्यातील पांगरी नवघरे येथील १७ वर्षीय विठ्ठल माधव तागड हा अकराव्या वर्गात शिकणारा युवक शेतात बकर्‍या चारत असताना विज अंगावर कोसळल्याने जागीच ठार झाला. ही घटना दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. इतर दोघे जण जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अकोला येथे उपचारार्थ पाठविण्यात आले. पांगरी नवघरेच्या उत्तरेकडे असलेल्या धरणाच्या बाजूच्या शेतामध्ये विठ्ठल तागड, विष्णू नवघरे आणि वामन तुकाराम नवघरे हे बकर्‍या चारण्यासाठी गेले होते. दुपारी साडे ३ वाजताच्या सुमारास अचानक वादळी वारे व विजांच्या कडकडाटात पाऊस सुरू झाला. त्यामध्ये वीज अंगावर कोसळल्याने विठ्ठल तागड हा जागीच ठार झाला, तर विष्णू नवघरे (४0)े गंभीर जखमी झाले. वामन नवघरे (४५) हे किरकोळ जखमी झाले. जखमी विष्णू नवघरे यांना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले, तर वामन नवघरे यांच्यावर मालेगाव येथील एका खासगी दवाखान्यामध्ये उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्याला घरी पाठविण्यात आले आहे. या घटनेमध्ये त्यांच्याकडील चार बकर्‍यासुद्धा ठार झाल्या आहेत. पुढील तपास ठाणेदार तट याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. अन्य एका घटनेत रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील १६ वर्षीय रामा लोणकर या अकराव्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्यांवर वीज कोसळली. त्यामध्ये तो ठार झाल्याची घटना १0 एप्रिलला ५.३0 वाजता घडली. गावानजीक असलेल्या शेतातून तो घरी परत येत होता. वाटेतच विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्याने गावाकडे येण्यास सुरुवात करतानाच त्याच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये त्याचा तेथेच मृत्यू झाला.