शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांनो टॅक्स जमा न केल्यास दोन टक्के शास्तीची आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : अकोलेकरांनी चालू वर्षाचा अथवा थकीत मालमत्ता कराचा भरणा न केल्यास त्यांना दोन टक्के शास्तीचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : अकोलेकरांनी चालू वर्षाचा अथवा थकीत मालमत्ता कराचा भरणा न केल्यास त्यांना दोन टक्के शास्तीचा भुर्दंड बसणार आहे. महापालिकेच्या शास्ती अभय योजनेंतर्गत केवळ नऊ दिवसांचा कालावधी शिल्लक असून, या कालावधीनंतर नागरिकांना नाहक दोन टक्के अतिरिक्त दंड जमा करावा लागणार आहे. दिनांक ३१ मार्चनंतर प्रशासनाकडून थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.

महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे १९९८पासून पुनर्मूल्यांकन करण्यात आले नव्हते. २००१ साली मनपाची स्थापना झाल्यानंतर प्रशासनाने सेल्फ असेसमेंटची प्रक्रिया राबवली होती. परंतु, ही प्रक्रिया महापालिकेच्या मुळावर उठली. मालमत्तांचे नियमानुसार पुनर्मूल्यांकन करणे व मालमत्ता करामध्ये सुधारित दरवाढ करण्याची बाब जाणीवपूर्वक बाजूला सारण्यात आली होती. यामध्ये मनपातील आजी-माजी पदाधिकारी तसेच प्रशासनातील भ्रष्ट प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. तत्कालिन आयुक्त अजय लहाने यांनी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी तसेच शासनाकडून प्राप्त विकास निधीमध्ये मनपाचा आर्थिक हिस्सा जमा करण्याच्या उद्देशातून मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्यासह सुधारित करवाढीचा निर्णय घेतला. या निर्णयाला सभागृहात विरोधी पक्ष काँग्रेस, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडीने कडाडून विरोध केला. प्रशासनाने अकोलेकरांवर अवाजवी करवाढ लादल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे. यादरम्यान, अजय लहाने यांच्या निर्देशानुसार मालमत्ताधारकांना सुधारित करवाढीच्या नोटीस जारी करण्यात येऊन त्यांच्याकडून सुधारित करवाढीनुसार करवसुली सुरु करण्यात आली होती. परंतु, अकोलेकरांनी मालमत्ता कर जमा करण्यास आखडता हात घेतल्यामुळे प्रशासनाने थकीत मालमत्ता करावर दोन टक्के शास्ती (दंडात्मक रक्कम) लागू करण्याचा निर्णय घेतला.

व्यापाऱ्यांची सत्ता पक्षाकडे धाव!

चालू व थकीत मालमत्ता करावर दोन टक्के शास्तीची आकारणी केली जात असल्यामुळे शहरातील अनेक व्यापारी, डॉक्टर, शिक्षण संस्था संचालक तसेच धनाढ्य व्यावसायिकांनी सत्ता पक्षाकडे धाव घेतली तसेच शास्तीच्या दंडातून सूट मिळावी, यासाठी शास्ती अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा आग्रह धरला होता. प्रशासनानेही एक पाऊल पुढे टाकत ३१ मार्चपर्यंत शास्ती अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. या मुदतीनंतर दंडात्मक रक्कम लागू केली जाणार आहे.

कोरोनामुळे कर वसुलीवर परिणाम

शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून, जिल्हा व मनपा प्रशासनाच्या निर्बंधांमुळे व्यवसाय विस्कळीत झाले आहेत. याचा परिणाम मनपाच्या कर वसुलीवर होत आहे.