शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

अकोलेकरांनो टॅक्स जमा न केल्यास दोन टक्के शास्तीची आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : अकोलेकरांनी चालू वर्षाचा अथवा थकीत मालमत्ता कराचा भरणा न केल्यास त्यांना दोन टक्के शास्तीचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : अकोलेकरांनी चालू वर्षाचा अथवा थकीत मालमत्ता कराचा भरणा न केल्यास त्यांना दोन टक्के शास्तीचा भुर्दंड बसणार आहे. महापालिकेच्या शास्ती अभय योजनेंतर्गत केवळ नऊ दिवसांचा कालावधी शिल्लक असून, या कालावधीनंतर नागरिकांना नाहक दोन टक्के अतिरिक्त दंड जमा करावा लागणार आहे. दिनांक ३१ मार्चनंतर प्रशासनाकडून थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.

महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे १९९८पासून पुनर्मूल्यांकन करण्यात आले नव्हते. २००१ साली मनपाची स्थापना झाल्यानंतर प्रशासनाने सेल्फ असेसमेंटची प्रक्रिया राबवली होती. परंतु, ही प्रक्रिया महापालिकेच्या मुळावर उठली. मालमत्तांचे नियमानुसार पुनर्मूल्यांकन करणे व मालमत्ता करामध्ये सुधारित दरवाढ करण्याची बाब जाणीवपूर्वक बाजूला सारण्यात आली होती. यामध्ये मनपातील आजी-माजी पदाधिकारी तसेच प्रशासनातील भ्रष्ट प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. तत्कालिन आयुक्त अजय लहाने यांनी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी तसेच शासनाकडून प्राप्त विकास निधीमध्ये मनपाचा आर्थिक हिस्सा जमा करण्याच्या उद्देशातून मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्यासह सुधारित करवाढीचा निर्णय घेतला. या निर्णयाला सभागृहात विरोधी पक्ष काँग्रेस, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडीने कडाडून विरोध केला. प्रशासनाने अकोलेकरांवर अवाजवी करवाढ लादल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे. यादरम्यान, अजय लहाने यांच्या निर्देशानुसार मालमत्ताधारकांना सुधारित करवाढीच्या नोटीस जारी करण्यात येऊन त्यांच्याकडून सुधारित करवाढीनुसार करवसुली सुरु करण्यात आली होती. परंतु, अकोलेकरांनी मालमत्ता कर जमा करण्यास आखडता हात घेतल्यामुळे प्रशासनाने थकीत मालमत्ता करावर दोन टक्के शास्ती (दंडात्मक रक्कम) लागू करण्याचा निर्णय घेतला.

व्यापाऱ्यांची सत्ता पक्षाकडे धाव!

चालू व थकीत मालमत्ता करावर दोन टक्के शास्तीची आकारणी केली जात असल्यामुळे शहरातील अनेक व्यापारी, डॉक्टर, शिक्षण संस्था संचालक तसेच धनाढ्य व्यावसायिकांनी सत्ता पक्षाकडे धाव घेतली तसेच शास्तीच्या दंडातून सूट मिळावी, यासाठी शास्ती अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा आग्रह धरला होता. प्रशासनानेही एक पाऊल पुढे टाकत ३१ मार्चपर्यंत शास्ती अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. या मुदतीनंतर दंडात्मक रक्कम लागू केली जाणार आहे.

कोरोनामुळे कर वसुलीवर परिणाम

शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून, जिल्हा व मनपा प्रशासनाच्या निर्बंधांमुळे व्यवसाय विस्कळीत झाले आहेत. याचा परिणाम मनपाच्या कर वसुलीवर होत आहे.