शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

दोन वर्षात कोट्यावधीचा धान्यसाठा जप्त

By admin | Updated: April 4, 2015 02:00 IST

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या गत दोन वर्षांत १३00 कारवाया; १ हजार ९८५ लोकांवर गुन्हा दाखल.

बुलडाणा : समाजातील प्रत्येकस्तरातील घटकास अन्नधान्य मिळावे, या उद्देशाने शासनाकडून गोर गरिबांना स्वस्त दरात धान्य वाटप केले जाते; मात्र या अन्नधान्याची साठेबाजी व काळाबाजार मोठय़ा प्रमाणात होतो. यावर अंकुश लावण्यासाठी राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने गत दोन वर्षात राज्यभरात जवळपास १३00 कारवाया केल्या. या कारवायांमध्ये कोट्यवधीचा धान्यसाठा जप्त करुन १ हजार ९८५ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. काही स्वस्त धान्य दुकानदार महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धान्याची उचल करतात व योग्य पुरवठा करीत नाही, स्वत:च्या मर्जीने लाभार्थी निवडतात, मयत व परगावी असणार्‍या लोकांची बोगस नावे घालतात, शिवाय अन्नधान्याची साठेबाजी केली जाते. या गैरव्यवहाराबाबत प्राप्त ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत अन्न व नागरी पुरवठा विभागाने अवैध धान्यसाठा करणार्‍यांविरुद्ध विविध जिल्ह्यात धाडसत्र राबविले. अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये साठेबाजी व काळाबाजार करणार्‍यावर २0१३ आणि २0१४ या दोन वर्षात १ हजार ३७८ धाडी घालण्यात आल्या. या कारवाईत गुन्हे नोंद करुन १ हजार ९८५ लोकांना अटक करण्यात आली. १ हजार ३२९ लोकांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले.

*पेट्रोल व गॅस सिलेंडरचा काळाबाजार

      मागील काही वर्षांपासून रॉकेल, पेट्रोल आणि गॅस सिलींडरचा काळाबाजार करणार्‍यांवर राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने कारवाई केली. यात ३८ लाख रुपये किंमतीचे पेट्रोल, ७३ लाख रुपयांचे डिझेल, २ कोटी ४९ लाख रुपयांचे १६ हजार गॅस सिलींडर जप्त करण्यात आले.