शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम वर्‍हाडावर तिबार पेरणीचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:22 IST

अकोला: यावर्षी पावसाने प्रदीर्घ दांडी मारल्याने तिबार पेरणीवरही संकट निर्माण झाले आहे. पेरणीचा पूरक कालावधी ओलांडल्यानंतर लाखो शेतकर्‍यांनी पेरणी केली. २५ जुलैपर्यंत जवळपास ४0 टक्क्यांवर पेरणी करण्यात आली. तेथील उत्पादन आता ५0 टक्के घटण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आता पावसाशिवाय पर्याय नसल्याने शेतकर्‍यांचे डोळे नभाकडे लागली आहेत. 

ठळक मुद्देपावसाने प्रदीर्घ दांडी मारल्याने तिबार पेरणीचे संकट२५ जुलैपर्यंत जवळपास ४0 टक्क्यांवर पेरणीउत्पादन ५0 टक्के घटण्याची शक्यता 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: यावर्षी पावसाने प्रदीर्घ दांडी मारल्याने तिबार पेरणीवरही संकट निर्माण झाले आहे. पेरणीचा पूरक कालावधी ओलांडल्यानंतर लाखो शेतकर्‍यांनी पेरणी केली. २५ जुलैपर्यंत जवळपास ४0 टक्क्यांवर पेरणी करण्यात आली. तेथील उत्पादन आता ५0 टक्के घटण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आता पावसाशिवाय पर्याय नसल्याने शेतकर्‍यांचे डोळे नभाकडे लागली आहेत. पश्‍चिम विदर्भात सरासरी ३२ लाख ७५ हजार  हेक्टर पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले होते. यावर्षी समाधानकारक पाऊस होईल, असे भाकीत हवामानशास्त्र विभागाने केल्याने सर्वच स्तरावर कृषी निविष्ठा ते पेरणी, असे नियोजन करण्यात आले होते. तथापि, पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या. १५ जुलैपर्यंत राज्यासह विदर्भात ५0 टक्क्यांच्यावर पेरण्याची आकडेवारी सरकली नव्हती. १५ जुलैनंतर राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक पावसाच्या भरवशावर शेतकर्‍यांनी आपत्कालीन पीक पेरणी केली आहे.१५ जुलैपर्यंत कापूस, तूर, सोयाबीन पिकाच्या पेरणीची ही वेळ होती; परंतु शेतकर्‍यांनी २५ ते २७ जुलैपर्यंत पेरणी केली. त्यामुळेच १५ जुलैनंतर ७ ते १0 दिवसांत ४0 ते ४५ टक्के पेरणी झाली आहे. पश्‍चिम विदर्भात पेरणीचा आकडा आजमितीस ९२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अकोला जिल्ह्यात १५ ते २0 जुलैपर्यंत केवळ ५३ टक्के पेरणी झाली होती. १५ जुलैनंतर तुरळक पावसाला सुरुवात झाल्याने शेतकर्‍यांनी धाडसाने पेरणी केली. जवळपास या ७ ते ८ दिवसांत ४0 टक्क्यांच्यावर पेरणी करण्यात आली; पण तेव्हापासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चक्रावून गेला आहे. तापमान वाढल्याने पिके कोमेजली आहेत. उशिरा पेरणी केलेली पिके ही दोन पानांवर आहेत. तापमानाचा मार सहन होत नसल्याने या पिकांनी माना टाकल्या आहेत.

१५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात ५0 टक्के घट येते, हे सूत्रच आहे. आठ दिवस पाऊस लांबल्यास १0 टक्के उत्पादनात घट होते, तसेच २0 ते २५ दिवस लांबल्यास ४0 टक्क्यांवर उत्पादनात घट होत असते. काही पिकात ही घट ३0 ते ४0 टक्के असते.- डॉ. दिलीप एम. मानकर,संचालक (संशोधन), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.