शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

पश्‍चिम वर्‍हाडावर तिबार पेरणीचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:22 IST

अकोला: यावर्षी पावसाने प्रदीर्घ दांडी मारल्याने तिबार पेरणीवरही संकट निर्माण झाले आहे. पेरणीचा पूरक कालावधी ओलांडल्यानंतर लाखो शेतकर्‍यांनी पेरणी केली. २५ जुलैपर्यंत जवळपास ४0 टक्क्यांवर पेरणी करण्यात आली. तेथील उत्पादन आता ५0 टक्के घटण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आता पावसाशिवाय पर्याय नसल्याने शेतकर्‍यांचे डोळे नभाकडे लागली आहेत. 

ठळक मुद्देपावसाने प्रदीर्घ दांडी मारल्याने तिबार पेरणीचे संकट२५ जुलैपर्यंत जवळपास ४0 टक्क्यांवर पेरणीउत्पादन ५0 टक्के घटण्याची शक्यता 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: यावर्षी पावसाने प्रदीर्घ दांडी मारल्याने तिबार पेरणीवरही संकट निर्माण झाले आहे. पेरणीचा पूरक कालावधी ओलांडल्यानंतर लाखो शेतकर्‍यांनी पेरणी केली. २५ जुलैपर्यंत जवळपास ४0 टक्क्यांवर पेरणी करण्यात आली. तेथील उत्पादन आता ५0 टक्के घटण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आता पावसाशिवाय पर्याय नसल्याने शेतकर्‍यांचे डोळे नभाकडे लागली आहेत. पश्‍चिम विदर्भात सरासरी ३२ लाख ७५ हजार  हेक्टर पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले होते. यावर्षी समाधानकारक पाऊस होईल, असे भाकीत हवामानशास्त्र विभागाने केल्याने सर्वच स्तरावर कृषी निविष्ठा ते पेरणी, असे नियोजन करण्यात आले होते. तथापि, पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या. १५ जुलैपर्यंत राज्यासह विदर्भात ५0 टक्क्यांच्यावर पेरण्याची आकडेवारी सरकली नव्हती. १५ जुलैनंतर राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक पावसाच्या भरवशावर शेतकर्‍यांनी आपत्कालीन पीक पेरणी केली आहे.१५ जुलैपर्यंत कापूस, तूर, सोयाबीन पिकाच्या पेरणीची ही वेळ होती; परंतु शेतकर्‍यांनी २५ ते २७ जुलैपर्यंत पेरणी केली. त्यामुळेच १५ जुलैनंतर ७ ते १0 दिवसांत ४0 ते ४५ टक्के पेरणी झाली आहे. पश्‍चिम विदर्भात पेरणीचा आकडा आजमितीस ९२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अकोला जिल्ह्यात १५ ते २0 जुलैपर्यंत केवळ ५३ टक्के पेरणी झाली होती. १५ जुलैनंतर तुरळक पावसाला सुरुवात झाल्याने शेतकर्‍यांनी धाडसाने पेरणी केली. जवळपास या ७ ते ८ दिवसांत ४0 टक्क्यांच्यावर पेरणी करण्यात आली; पण तेव्हापासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चक्रावून गेला आहे. तापमान वाढल्याने पिके कोमेजली आहेत. उशिरा पेरणी केलेली पिके ही दोन पानांवर आहेत. तापमानाचा मार सहन होत नसल्याने या पिकांनी माना टाकल्या आहेत.

१५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात ५0 टक्के घट येते, हे सूत्रच आहे. आठ दिवस पाऊस लांबल्यास १0 टक्के उत्पादनात घट होते, तसेच २0 ते २५ दिवस लांबल्यास ४0 टक्क्यांवर उत्पादनात घट होत असते. काही पिकात ही घट ३0 ते ४0 टक्के असते.- डॉ. दिलीप एम. मानकर,संचालक (संशोधन), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.