शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

जलयुक्त शिवार बनले शेतकऱ्यांसाठी छळयुक्त!

By admin | Updated: May 2, 2017 01:14 IST

अकोट- महाराष्ट्र शासनाचे जलयुक्त शिवार अभियान हे अकोट तालुक्यात यावर्षी शेतकऱ्यांकरिता छळयुक्त ठरत असल्याचे दिसून येत आहे.

विजय शिंदे - अकोटमहाराष्ट्र शासनाचे जलयुक्त शिवार अभियान हे अकोट तालुक्यात यावर्षी शेतकऱ्यांकरिता छळयुक्त ठरत असल्याचे दिसून येत आहे. महसूल विभागाने एकाच ठेकेदाराला तासाने जलयुक्तची कामे दिली. त्यानंतर ते कंत्राट रद्द केले आहे. आता कृषी विभागाने या कामांकरिता ई-टेंडर बोलाविण्याची तयारी सुरू केली आहे. महसूल विभागाने जलसंधारणाच्या कामात खोडा घातल्याने यावर्षी उन्हाळ्यात सुरू होणारी जलयुक्त शिवार अभियानाची कामे पावसाळ्यात होतात की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अकोट तालुक्यात सन २०१७-१८ करिता १९ गावांची निवड करण्याचे लक्ष्यांक कृषी व महसूल विभागाने ठेवले आहे; परंतु अद्यापपर्यंत गावांची निवडसुद्धा होऊ शकली नाही. विशेष म्हणजे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे होण्याकरिता अकोट तहसील कार्यालयाकडे कृषी विभागाने ३६ कामांची परवानगी मागितली होती; परंतु ४-५ कामे मंजूर आराखड्यानुसार नसल्याने तहसील कार्यालयाने सरसकट सर्वच कामे नामंजूर केली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जलयुक्त शिवारच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. जलयुक्त शिवार अभियानाची कामे कृषी विभाग, जिल्हा परिषद लघुसिंचन, लघुसिंचन जलसंधारण, सामाजिक वनीकरण व पाटबंधारे विभाग, पंचायत समिती यांच्या मार्फत करण्यात येतात. या योजनेला सन २०१५-१६ मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. महसूल व कृषी विभागाने खोलीकरण व रुंदीकरणाची बहुतांश कामे करून अनेक गावे पाणीदार केली होती; परंतु २०१६-१७ या कालावधीत या योजनेंतर्गत्त अनेक कामे रखडली. एकाच व्यक्तीच्या हाती सर्व कामे देण्याचा मनसुबा महसूल विभागाने रचल्याने कृषी विभागानेसुद्धा त्याला प्रतिसाद दिला नाही. तर महसूल विभागानेसुद्धा कृषी विभागाने सादर केलेल्या अनेक आराखड्यांना मंजुरी दिली नाही. यामध्ये जलसंधारणाची आस घेऊन बसलेल्या शेतकऱ्यांचा चांगलाच छळ झाला. विशेष म्हणजे शासनाची योजना असतानाही महसूल विभागाने जलयुक्त शिवार अभियानाची व्यापक जनजागृती न करता उलट खोडा घालण्याचे काम केल्याने शासनाचे हे जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांकरिता छळयुक्त ठरले आहे. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१६-१७ मध्ये २३ गावांची निवड करण्यात आली होती. या २३ गावांकरिता ७५९ कामे घेण्यात आली, त्यापैकी २४२ कामांना तांत्रिक मंजुरी, तर १६१ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली, तर केवळ ११३ कामांवर १४८.00 लक्ष खर्च दाखविण्यात आला आहे. शिवाय सन २०१५-१६ मध्ये ३५ गावे योजनेत सहभागी झाली होती. त्यापैकी ३३ गावे जलयुक्त झाली आहेत. या ३३ गावांमध्ये २३५ पैकी २०४ कामे करण्यात आली असून, या कामांवर ५४१.३६ लक्ष रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. वॉटर कप स्पर्धा सेल्फी पॉइंट महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची जनजागृती करण्याकरिता अधिकारी वर्ग कमी पडत आहेत. दुसरीकडे मात्र पाणी फाउंडेशन या खासगी संस्थेने सुरू केलेल्या वॉटर कप स्पर्धेत हिरिरीने भाग घेताना दिसत आहेत. या स्पर्धेत अकोट तालुक्यातून ३५ गावांची निवड करण्यात आली आहे; मात्र अनेक ठिकाणी श्रमदान कमी आणि सेल्फी फोटो घेणाऱ्यांची संख्याच जास्त दिसून येत आहे. अशा स्थितीत वॉटर कप स्पर्धा श्रमदानाचे स्थळ हे सेल्फी पॉइंट ठरत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अकोट तालुक्यात यावर्षी १९ गावांची निवड करणे सुरू आहे. अनेक गावे जलयुक्त झाली आहेत. लवकरच ई- टेंडरद्वारे जलसंधारणाची कामे काढून कामांना प्रारंभ करण्यात येईल. - मंगेश ठाकरे, तालुका कृषी अधिकारी, अकोट