शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

‘ट्रायकोकार्ड’ जैविक घटक तंत्रज्ञानावर भर : रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:39 IST

​​​​​​​अकोला : विषमुक्त अन्न निर्मितीसाठी रासायनिक कीटकनाशक ांचा अतिरेकी व अशास्त्रीय वापर टाळण्यासाठी जैविक घटक उत्पादन तंत्रज्ञानावर भर दिला जात असून, निंबोळी अर्क, ट्रायकोकार्ड, क्रायसोपा व किडा या जैविक घटकांची माहिती शेतकर्‍यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळेत दिली जात आहे. विदर्भातील सहा तालुक्यांतील शेतकर्‍यांना यासंदर्भात प्रशिक्षित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनिंबोळी अर्क, ट्रायकोकार्ड, क्रायसोपा व किडा या जैविक घटकांची माहिती शेतकर्‍यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळेत दिली जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विषमुक्त अन्न निर्मितीसाठी रासायनिक कीटकनाशकांचा अतिरेकी व अशास्त्रीय वापर टाळण्यासाठी जैविक घटक उत्पादन तंत्रज्ञानावर भर दिला जात असून, निंबोळी अर्क, ट्रायकोकार्ड, क्रायसोपा व किडा या जैविक घटकांची माहिती शेतकर्‍यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळेत दिली जात आहे. विदर्भातील सहा तालुक्यांतील शेतकर्‍यांना यासंदर्भात प्रशिक्षित करण्यात आले आहे.वैदर्भीय शेती, शेतकरी हे किडी व रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावाने त्रस्त होत असल्याचे चित्र आहे. गेल्या हंगामात कापूस व सोयाबीन या महत्त्वाच्या पिकांकडून अपेक्षित उत्पादन तर मिळालेच नाही, किंबहुना रासायनिक कीटकनाशक ांच्या अतिरेकी किंवा अशास्त्रीय वापराने जीवित हानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तंत्रज्ञानासह अल्प खर्चाच्या शाश्‍वत उपाययोजनासुद्धा विविध माध्यमांतून शेतकर्‍यांपर्यंत पोहोविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाच्यावतीने विदर्भातील सहा तालुक्यांतील ५१ शेतकर्‍यांना जैविक घटकांचे शुक्रवारी प्रशिक्षण देण्यात आले. शेतकर्‍यांना घाटेअळी विषाणू, निंबोळी अर्क, ट्रायकोकार्ड, क्रायसोपा व ढाल किडा या सर्व जैविक घटकांचे उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती प्रत्यक्ष प्रयोगशाळेमध्ये प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आली.  रविवारी संपलेल्या तीन दिवसीय प्रशिक्षणात जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेचे प्रभारी डॉ. नीरज सातपुते, तसेच डॉ. अनिल कोल्हे, डॉ. गजानन लांडे व डॉ. सुनील भलकारे यांनी यासंबंधी प्रात्यक्षिकासह विस्तृत माहिती शेतकर्‍यांना दिली. कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी रासायनिक कीटकनाशक ांचे गुणधर्म व वापराच्या पद्धती समजावून सांगत सेंद्रिय शेतीचा वाढता प्रसार लक्षात घेता शाश्‍वत व अल्प खर्चाच्या जैविक कीटकनाशक ांचे व मित्र कीटकांचे महत्त्व अतिशय साध्या-सोप्या भाषेत समजावून सांगितले. तसेच शेतकर्‍यांनी जैविक घटकाचे उत्पादन करण्याचे तंत्र आत्मसात करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना कृषिभूषण शेतकरी हनवंतराव देशमुख यांनी विद्यापीठाचे आभार व्यक्त करीत पर्यावरणपूरक सेंद्रिय शेती करताना जैविक घटकांचा प्रभावी वापर शेतकर्‍यांना लाभदायक ठरणार असून, जीवित हानी टळेल व विषमुक्त अन्न उपलब्ध करण्याचे आपले कर्तव्य पार पडण्याचा आनंदसुद्धा मिळेल, असा आशावाद व्यक्त केला. 

टॅग्स :agricultureशेतीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ