शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

ग्रामपंचायतींच्या वृक्ष लागवडीचा बोजवारा; उद्दिष्ट ५.३५ लाख, लागवड केवळ ५१ हजार!

By संतोष येलकर | Updated: October 10, 2023 17:56 IST

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पावसाळ्यात ग्रामपंचायती आणि विविध यंत्रणांमार्फत वृक्षलागवड करण्यात येते.

अकोला : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्षलागवड कार्यक्रमात यंदा जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींच्या स्तरावर ५ लाख ३५ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असताना, सप्टेंबर अखेरपर्यत केवळ ५१ हजार ६०० वृक्षलागवड करण्यात आली. सातपैकी तीनच तालुक्यांतील ग्रामपंचायतींनी वृक्षलागवड केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या वृक्षलागवडीचा बोजवारा उडाल्याचे वास्तव समोर आले आहे. 

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पावसाळ्यात ग्रामपंचायती आणि विविध यंत्रणांमार्फत वृक्षलागवड करण्यात येते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींच्या स्तरावर प्रत्येकी एक हजार याप्रमाणे ५ लाख ३५ हजार वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदमार्फत निश्चित करण्यात आले होते. 

वृक्षलागवड करण्याची मुदत गेल्या सप्टेंबर अखेर संपुष्टात आली असून, त्यामध्ये उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी तीनच तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या स्तरावर केवळ ५१ हजार ६०० वृक्षलागवड करण्यात आली आहे. उर्वरित चार तालुक्यांतील ग्रामपंचायतींनी वृक्षलागवड केली नसल्याने यंदा जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या स्तरावरील वृक्षलागवडीचा बोजवारा उडाल्याचे वास्तव समोर आले आहे.

तीन तालुक्यांत ग्रामपंचायतींच्या वृक्षलागवडीचे असे आहे वास्तव

तालुका             वृक्षलागवडअकोला             १७,०००पातूर                 २७,०००बार्शीटाकळी       ७६००

५३५ ग्रामपंचायतींपैकी केवळ २३ ग्रामपंचायतींनी केली लागवड !प्रत्येक ग्रामपंचायतीने एक हजार याप्रमाणे जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींनी ५ लाख ३५ हजार वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. परंतु, त्यापैकी केवळ २३ ग्रामपंचायतींनी ५१ हजार ६०० वृक्षलागवड केली आहे. अकोला तालुक्यात १०, पातूर तालुक्यात ९ आणि बार्शीटाकळी तालुक्यात ४ अशा एकूण २३ ग्रामपंचायतींच्या स्तरावर वृक्षलागवड करण्यात आल्याचे चित्र आहे.

चार तालुक्यांत ग्रामपंचायतींनी केली नाही वृक्षलागवड !जिल्ह्यातील अकोला, पातूर व बार्शीटाकळी या तीन तालुक्यांतील ग्रामपंचायतींकडून ५१ हजार ६०० वृक्षलागवड करण्यात आली. परंतु जिल्ह्यातील बाळापूर, अकोट, तेल्हारा व मूर्तिजापूर या चार तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून वृक्षलागवड करण्यात आली नसल्याचे चित्र आहे.

२६ लाख रुपयांचा खर्च !जुलै ते सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या स्तरावर वृक्षलागवड करण्यात आली. त्यामध्ये सातपैकी तीनच तालुक्यांत केवळ ५१ हजार वृक्षलागवड करण्यात आली असून, लागवड आणि संगोपनाच्या कामावर २५ लाख ९७ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. 

टॅग्स :Akolaअकोला