शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

अकोला शहरात वाहतूक व्यवस्थेचा बट्टय़ाबोळ

By admin | Updated: September 16, 2014 18:22 IST

दुचाकी व तीनचाकी वाहने वाट्टेल तिथे लावण्यात येत असल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळते.

अकोला - शहरातील बेताल वाहतुकीने कळस गाठला असून, दुचाकी व तीनचाकी वाहने वाट्टेल तिथे लावण्यात येत असल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळते. रस्त्याच्या मधोमध वाहने लावण्यात येत असून, यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पुढाकार घेऊन वाहतूक शाखेच्या माध्यमातून टोईंग पथक सुरू केले आहे. टोईंग पथक सुरू होऊन पाच ते सहा दिवसांचा कालावधी उलटला असला तरी बहुतांश मार्गावरील वाहतूक व्यवस्था अद्यापही आहे त्याच स्थितीत आहे. वाहन चालक कुठलेही नियम पाळत नसून आपली दुचाकी रस्त्यावर तसेच रस्त्याच्या मधोमध लावत असल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. शहरातील अत्यंत रहदारीचे असलेल्या मार्गावर वाहतुकीला मोठय़ा प्रमाणात अडथळा निर्माण होत असून, याला ही वाहने जबाबदार असल्याचे दिसून आले. दुकान व कार्यालयासमोर असलेल्या रस्त्यावर वाहने लावण्यात येत असून, त्यामुळे रस्त्यावरील वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. टोईंग पथक कार्यान्वित केल्यानंतर रस्त्यावरील अस्ताव्यस्त वाहनांवर कारवाई होणार, अशी अपेक्षा होती. मात्र, या टोईंग पथकातील कर्मचार्‍यांकडून दुजाभाव करण्यात येत असल्याने शहरातील बेताल वाहतूक आहे त्याच स्थितीत आहे. या टोईंग पथकाची कारवाई शहराच्या मध्यभाग व रहदारीचा मार्ग सोडून शहराबाहेर असलेल्या परिसरात सुरू असल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गांधी रोड, टिळक रोड, स्टेशन ते कौलखेड रोड, सिव्हिल लाईन्स रोड, रतनलाल प्लॉट, जठारपेठ, दुर्गा चौक, जय हिंद चौक, जिल्हाधिकारी कार्यालय रोडसह शहराच्या महत्त्वाच्या मार्गावर वाहने लावण्यात येत असून, यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. या मार्गावरील अस्ताव्यस्त वाहनांवर कारवाई केल्यास वाहतुकीची समस्या बहुतांश प्रमाणात मार्गी लागण्याची शक्यता आहे.