शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

अकोला शहरात वाहतूक व्यवस्थेचा बट्टय़ाबोळ

By admin | Updated: September 16, 2014 18:22 IST

दुचाकी व तीनचाकी वाहने वाट्टेल तिथे लावण्यात येत असल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळते.

अकोला - शहरातील बेताल वाहतुकीने कळस गाठला असून, दुचाकी व तीनचाकी वाहने वाट्टेल तिथे लावण्यात येत असल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळते. रस्त्याच्या मधोमध वाहने लावण्यात येत असून, यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पुढाकार घेऊन वाहतूक शाखेच्या माध्यमातून टोईंग पथक सुरू केले आहे. टोईंग पथक सुरू होऊन पाच ते सहा दिवसांचा कालावधी उलटला असला तरी बहुतांश मार्गावरील वाहतूक व्यवस्था अद्यापही आहे त्याच स्थितीत आहे. वाहन चालक कुठलेही नियम पाळत नसून आपली दुचाकी रस्त्यावर तसेच रस्त्याच्या मधोमध लावत असल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. शहरातील अत्यंत रहदारीचे असलेल्या मार्गावर वाहतुकीला मोठय़ा प्रमाणात अडथळा निर्माण होत असून, याला ही वाहने जबाबदार असल्याचे दिसून आले. दुकान व कार्यालयासमोर असलेल्या रस्त्यावर वाहने लावण्यात येत असून, त्यामुळे रस्त्यावरील वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. टोईंग पथक कार्यान्वित केल्यानंतर रस्त्यावरील अस्ताव्यस्त वाहनांवर कारवाई होणार, अशी अपेक्षा होती. मात्र, या टोईंग पथकातील कर्मचार्‍यांकडून दुजाभाव करण्यात येत असल्याने शहरातील बेताल वाहतूक आहे त्याच स्थितीत आहे. या टोईंग पथकाची कारवाई शहराच्या मध्यभाग व रहदारीचा मार्ग सोडून शहराबाहेर असलेल्या परिसरात सुरू असल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गांधी रोड, टिळक रोड, स्टेशन ते कौलखेड रोड, सिव्हिल लाईन्स रोड, रतनलाल प्लॉट, जठारपेठ, दुर्गा चौक, जय हिंद चौक, जिल्हाधिकारी कार्यालय रोडसह शहराच्या महत्त्वाच्या मार्गावर वाहने लावण्यात येत असून, यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. या मार्गावरील अस्ताव्यस्त वाहनांवर कारवाई केल्यास वाहतुकीची समस्या बहुतांश प्रमाणात मार्गी लागण्याची शक्यता आहे.