शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

पाण्याच्या बचतीसाठी परिवहन महामंडळाचा पुढाकार!

By admin | Updated: April 9, 2016 01:34 IST

कर्मचा-यांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन.

कारंजा लाड (जि. वाशिम): यंदा अवर्षणामुळे राज्यभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, सर्वत्र पाणीटंचाईची समस्या तीव्र रूप धारण करीत आहे. या पृष्ठभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. हाच विचार करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने राज्यभरातील अडीचशे आगार व प्रशासकीय कार्यालयांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. यंदा सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विविध संस्था, संघटना पाणीबचतीचे आवाहन करीत आहेत. यासाठी आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही पुढाकार घेतला आहे. प्रत्येक आगारात बसगाड्या धुणे, कर्मचारी निवास स्वच्छ करणे यासह प्रत्येक बसस्थानकावर प्रसाधनगृहात मोठय़ा प्रमाणात पाण्याचा वापर होतो. या सर्व बाबींसाठी पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास मोठय़ा प्रमाणात पाण्याची बचत होऊन त्याचा वापर इतरांसाठी करता येऊ शकतो, हे लक्षात घेऊन एसटी महामंडळाने सर्व आगार आणि प्रशासकीय कार्यालयांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नळ सुव्यवस्थित ठेवणे, पाण्याची गळती थांबविणे, पाण्याचे स्रोत स्वच्छ व प्रदूषणरहित ठेवणे, चालक-वाहकांच्या वेळोवेळी बैठका घेऊन पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी त्यांचे प्रबोधन करणे, तसेच बस स्थानकावरील पिण्याच्या पाण्याचा केवळ प्रवाशांच्या उपयोगासाठी वापर करणे आदी महत्त्वपूर्ण निर्देशांचाही समावेश आहे. एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होणार, हे गृहीत धरून महामंडळाच्या सर्व कर्मचार्‍यांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन पत्राद्वारे केले आहे.