शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, S-400 ने रॉकेट पाडले, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
3
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
4
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
5
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
6
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
7
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
8
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
9
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
10
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
11
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
12
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
13
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
14
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
15
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
16
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
17
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
18
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
19
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
20
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या

पाण्याच्या बचतीसाठी परिवहन महामंडळाचा पुढाकार!

By admin | Updated: April 9, 2016 01:34 IST

कर्मचा-यांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन.

कारंजा लाड (जि. वाशिम): यंदा अवर्षणामुळे राज्यभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, सर्वत्र पाणीटंचाईची समस्या तीव्र रूप धारण करीत आहे. या पृष्ठभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. हाच विचार करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने राज्यभरातील अडीचशे आगार व प्रशासकीय कार्यालयांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. यंदा सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विविध संस्था, संघटना पाणीबचतीचे आवाहन करीत आहेत. यासाठी आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही पुढाकार घेतला आहे. प्रत्येक आगारात बसगाड्या धुणे, कर्मचारी निवास स्वच्छ करणे यासह प्रत्येक बसस्थानकावर प्रसाधनगृहात मोठय़ा प्रमाणात पाण्याचा वापर होतो. या सर्व बाबींसाठी पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास मोठय़ा प्रमाणात पाण्याची बचत होऊन त्याचा वापर इतरांसाठी करता येऊ शकतो, हे लक्षात घेऊन एसटी महामंडळाने सर्व आगार आणि प्रशासकीय कार्यालयांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नळ सुव्यवस्थित ठेवणे, पाण्याची गळती थांबविणे, पाण्याचे स्रोत स्वच्छ व प्रदूषणरहित ठेवणे, चालक-वाहकांच्या वेळोवेळी बैठका घेऊन पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी त्यांचे प्रबोधन करणे, तसेच बस स्थानकावरील पिण्याच्या पाण्याचा केवळ प्रवाशांच्या उपयोगासाठी वापर करणे आदी महत्त्वपूर्ण निर्देशांचाही समावेश आहे. एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होणार, हे गृहीत धरून महामंडळाच्या सर्व कर्मचार्‍यांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन पत्राद्वारे केले आहे.