शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या बचतीसाठी परिवहन महामंडळाचा पुढाकार!

By admin | Updated: April 9, 2016 01:34 IST

कर्मचा-यांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन.

कारंजा लाड (जि. वाशिम): यंदा अवर्षणामुळे राज्यभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, सर्वत्र पाणीटंचाईची समस्या तीव्र रूप धारण करीत आहे. या पृष्ठभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. हाच विचार करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने राज्यभरातील अडीचशे आगार व प्रशासकीय कार्यालयांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. यंदा सर्वत्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विविध संस्था, संघटना पाणीबचतीचे आवाहन करीत आहेत. यासाठी आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही पुढाकार घेतला आहे. प्रत्येक आगारात बसगाड्या धुणे, कर्मचारी निवास स्वच्छ करणे यासह प्रत्येक बसस्थानकावर प्रसाधनगृहात मोठय़ा प्रमाणात पाण्याचा वापर होतो. या सर्व बाबींसाठी पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास मोठय़ा प्रमाणात पाण्याची बचत होऊन त्याचा वापर इतरांसाठी करता येऊ शकतो, हे लक्षात घेऊन एसटी महामंडळाने सर्व आगार आणि प्रशासकीय कार्यालयांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नळ सुव्यवस्थित ठेवणे, पाण्याची गळती थांबविणे, पाण्याचे स्रोत स्वच्छ व प्रदूषणरहित ठेवणे, चालक-वाहकांच्या वेळोवेळी बैठका घेऊन पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी त्यांचे प्रबोधन करणे, तसेच बस स्थानकावरील पिण्याच्या पाण्याचा केवळ प्रवाशांच्या उपयोगासाठी वापर करणे आदी महत्त्वपूर्ण निर्देशांचाही समावेश आहे. एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होणार, हे गृहीत धरून महामंडळाच्या सर्व कर्मचार्‍यांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन पत्राद्वारे केले आहे.