शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

जनता भाजी बाजारातील व्यावसायिकांची शिवसेनेकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:21 IST

अकोला : जनता भाजी बाजारातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनपा प्रशासनाच्या विरोधात बाजारातील भाजीपाला व फळे विक्री व्यावसायिकांनी सोमवारी ...

अकोला : जनता भाजी बाजारातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनपा प्रशासनाच्या विरोधात बाजारातील भाजीपाला व फळे विक्री व्यावसायिकांनी सोमवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांच्याकडे धाव घेतली. यावेळी व्यावसायिकांची बाजू ऐकून घेण्यासाठी सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे.

तत्कालीन नगरपरिषदेच्या कालावधीपासून भाजीपाला व फळे विक्री करण्यासाठी जनता भाजी बाजाराची जागा तत्कालीन जिल्हा प्रशासनाने लीज पट्ट्यावर दिली होती. दरम्यान, या जागेवरील आरक्षण लक्षात घेता, ही जागा विकसित करण्याच्या अनुषंगाने मनपा प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे जागेचे शुल्क जमा केले आहे. परंतु या जागेमध्ये मागील अनेक वर्षांपासून पिढ्यान्‌ पिढ्या व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांसाठी मनपा प्रशासनाकडे कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याचा आक्षेप व्यावसायिकांनी घेतला आहे. व्यावसायिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत प्रशासनाच्या स्तरावर दुकाने हटविण्यासाठी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी भाजीपाला व फळे विक्रेता व्यावसायिक संघटनांनी एकत्र येत सेनेचे जिल्हाप्रमुख तथा आ. नितीन देशमुख यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. चर्चेअंती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे बैठक आयोजित करून या बैठकीत व्यावसायिकांचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंती सेनेकडून पत्राद्वारे जिल्हाधिकार्‍यांना करण्यात आली आहे.

संघर्ष कृती समितीचे होणार गठन

मनपा प्रशासनाच्या एकतर्फी कार्यवाहीला विरोध करण्यासाठी जनता भाजी बाजारातील भाजीपाला व फळे विक्रेत्यांच्या विविध संघटना एकत्र येणार आहेत. यावेळी संघर्ष कृती समितीचे गठन करून त्याद्वारे प्रशासनाच्या मनमानी निर्णयाला लढा दिला जाणार असल्याचे संकेत आहेत.

सेना-काँग्रेसचा हातात हात

भाजी बाजारातील व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशातून शहरात शिवसेना व काँग्रेस एकत्र आले आहेत. काँग्रेसच्यावतीने विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण व सेनेचे शहरप्रमुख तथा गटनेता राजेश मिश्रा यांनी व्यावसायिकांसाठी हातात हात घेतल्याचे चित्र आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

जनता भाजी बाजारातील व्यावसायिकांची बाजू समजून घेण्यासाठी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. सेनेच्या पत्रावर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.