शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अकोट बाजार समितीत व्यापार बंद

By admin | Updated: May 17, 2017 02:44 IST

शिवसेनेचे हल्लाबोल आंदोलन : हमीभावाने माल खरेदीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: अकोट बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा उघड्यावर पडलेला शेतमाल शेडमध्ये ठेवण्यात यावा तसेच हमीदरापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करण्यात येऊ नये या मागणीकरिता शिवसेनेने बाजार समितीत १६ मे रोजी हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी बाजार समितीच्या सचिवांनी आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिले. दरम्यान, व्यापाऱ्यांनी हमी भावाने शेतमाल खरेदी करण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य बाजार हा पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे.अकोट बाजार समितीमध्ये शेतकरी पॅनल व शिवसेनेने माजी आमदार संजय गावंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बाजार समिती गाठली. यावेळी बाजार समितीची पाहणी केली असता शेतकऱ्यांचा माल उघड्यावर तर व्यापाऱ्यांचा माल टिनशेडमध्ये असल्याचे आढळून आले. दोन महिन्यांपेक्षा जास्त तूर खरेदीला वेळ लागत असल्याचे निदर्शनास आले. तसेच हमीदरापेक्षा कमी दराने तूर व इतर शेतमाल व्यापारी खरेदी करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सचिव राजकुमार माळवे यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी सचिव माळवे यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाची व्यवस्था शेडमध्ये करण्यात येईल. व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेला माल शेडमधून खाली करण्यात येईल. हमीदरापेक्षा कमी दराने खरेदी केलेला तूर व इतर शेतमाल खरेदीदारांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन माजी आमदार गावंडे यांना दिले. त्यानंतर बाजार समिती सचिव व व्यापारी यांची बैठक झाली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी हमीभावाच्या दराने तूर, भूईमूग व इतर शेतमाल खरेदी करण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती पुढील सूचनेपर्यंत धान्य बाजार बंद ठेवला असून, शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीकरिता आणू नये, अशा सूचना केल्या आहेत. बाजार समितीमध्ये माजी आमदार संजय गावंडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, तालुका प्रमुख श्याम गावंडे, भाऊराव अंबळकार, काशिराम साबळे, डॉ. गजानन महल्ले, प्रदीप वानखडे, ज्ञानदेव परनाटे, वत्सला खंडारे, प्रमोद खंडारे, मोहन गावंडे, डॉ. प्रमोद चोरे, साहेबराव भगत, निवृत्ती मेतकर, शरद नहाटे, दत्ताभाऊ चौधरी, राजू भालतिलक, ज्ञानेश्वर बोरोकार आदींसह शिवसेना, शेतकरी पॅनलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.