शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

टोमॅटो उत्पादक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली

By admin | Updated: March 10, 2015 02:04 IST

राज्यातील चित्र ; सहा वर्षांत ५७ लाख टन टोमॅटो उत्पादन.

अकोला : राज्यात गत सहा वर्षापासून टोमॅटोचे ५७ लाख टन उत्पादन झाले आहे. परंतु टोमॅटो मागणीच्या तुलनेत उत्पादन, पुरवठा जास्त असल्याने टोमॅटोचे दर कोसळलेले राहत आहेत. परिणामी टोमॅटो उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकर्‍यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येते. या परिस्थितीमुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली सापडले आहेत. राज्यातील पीक क्षेत्रातील सुमारे २९ हजार ११0 हेक्टर क्षेत्र हे टोमॅटो लागवडी खालील आहे. खरीप, रब्बी व उन्हाळी या तीनही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करता येत असल्यामुळे टोमॅटो उत्पादन घेण्याकडे विदर्भातील शेतकर्‍यांचाही कल वाढला आहे. राज्यात गत सहा वर्षापासून टोमॅटो लागवड क्षेत्रामध्ये दीड पटीने वाढ झाली आहे. राज्यातील नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर, सांगली या जिल्ह्यांपाठोपाठ पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही टोमॅटोचे उत्पादन घेतले जात आहे. सन २00९ पासून राज्यात ५६ लाख ८९ हजार टन टोमॅटोचे उत्पादन घेण्यात आले आहे. टोमॅटोचे उत्पादन मागणीच्या तुलनेत अधिक असल्याने शेतकर्‍यांना टोमॅटोची अत्यंत कमी भावात विक्री करावी लागत आहे. टोमॅटो उत्पादनासाठी एकरी सरासरी ७0 हजार रुपये खर्च येत असून, उत्पादन सरासरी पाच ते सहा टन होत आहे. वार्षिक सरासरी १0 ते १२ रुपये किलो दर टोमॅटोला राहत असल्याने शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांवर टोमॅटो रस्त्यावर फेकुन देण्याची वेळ येत आहे.