शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

टोकन यादी; १३७१ नावे गहाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:19 IST

अकोट : शासनाच्या आदेशानुसार तूर खरेदीकरिता शेतकर्‍यांना  देण्यात आलेल्या टोकन यादीपैकी अकोट तालुक्यातील १  हजार ३७१ शेतकर्‍यांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयाने अ पलोड केलेल्या यादीतून गहाळ झाल्याचे उघडकीस आले आहे.  त्यामुळे शेतकर्‍यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

ठळक मुद्देअकोट तालुक्यातील तुरीचा घोळ जिल्हाधिकारी कार्यालयाचा घोळ

विजय शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : शासनाच्या आदेशानुसार तूर खरेदीकरिता शेतकर्‍यांना  देण्यात आलेल्या टोकन यादीपैकी अकोट तालुक्यातील १  हजार ३७१ शेतकर्‍यांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयाने अ पलोड केलेल्या यादीतून गहाळ झाल्याचे उघडकीस आले आहे.  त्यामुळे शेतकर्‍यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.  नाफेडद्वारे तालुकास्तरावरील खरेदी केंद्रांवर हमीदराने तूर खरेदी  १0 जूनपासून बंद करण्यात आली होती. त्यानंतर ३१ मेपर्यंत  टोकन देण्यात आलेल्या शेतकर्‍यांची तूर बाजार हस्तक्षेप  योजनेंतर्गत खरेदी करण्याचा निर्णय घेत ३१ ऑगस्टपर्यंत तूर  खरेदी पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला; परंतु टोकन  दिलेल्या शेतकर्‍यांच्या तुरीचे पंचनामे करून तूर खरेदी करायची  की नाही, याचा निर्णय जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात  आला. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाला कृषी उत्पन्न बाजार  समितीमार्फत टोकन दिलेल्या शेतकर्‍यांचे नाव, गाव व टोकन  नंबरसह यादी पाठविण्यात आली. अकोट कृषी उत्पन्न बाजार  समितीनेसुद्धा ४ हजार ९१७ टोकनधारक शेतकर्‍यांची यादी  पाठविली. जिल्हाधिकार्‍यांनी टोकन देण्यात आलेल्या शे तकर्‍यांची तूर खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या घरी जाऊन तुरीचे  पंचनामे तीन दिवसांत पूर्ण करण्याकरिता तलाठी व कृषी  सहायकांना निर्देश दिले, तसेच ज्या टोकनधारक शेतकर्‍यांचे  पंचनामे करावयाचे आहेत, त्यांची यादी जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली; परंतु  या अधिकृत यादीमधून अकोट बाजार समितीने पाठविलेल्या  यादीमधील धरसोड करीत मधातल्या तब्बल १ हजार ३७१ शे तकर्‍यांची नावे गहाळ करण्यात आली असल्याचे उघडकीस  आले आहे. त्यामध्ये अकोट बाजार समितीने ४ हजार ९१७ टोकनधारक शे तकर्‍यांची यादी दिली. त्यापैकी ७३८ शेतकर्‍यांचे मोजमाप  झाले, तर पंचनाम्याकरिता अपलोड केलेल्या यादीत २१२२ शे तकर्‍यांची नावे आहेत; परंतु ती नावेसुद्धा कृषी उत्पन्न बाजार  समितीच्या टोकन रजिस्टरप्रमाणे नाहीत. त्या यादीमधील  अनुक्रमे ७३८ ते १७५३ यादरम्यानच्या १११५ शेतकर्‍यांची  नावे, १८९0 ते २0६८ मधील १७८ तर ४२४८ ते ४२८५ मधील  ३७ आणि ४३१२ ते ४३५३ यामधील ४१ असे एकूण १ हजार  ३७१ शेतकर्‍यांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुर्लक्षित पणामुळे गहाळ झाले असल्याचे दिसून येत आहे. या यादीनुसार  तलाठी व कृषी सहायकांनी पंचनामा करण्यास प्रारंभ केला  आहे. तर दुसरीकडे मधातील टोकनधारक शेतकर्‍यांची नावे  गहाळ असल्याने त्याच्यापुढील शेतकर्‍यांचे पंचनामे होण्याची  शक्यता आहे.