शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा हस्तांतरणावर मुंबईत आज बैठक

By admin | Updated: January 20, 2015 00:42 IST

अकोला महापालिकेचे अधिकारी मुंबईकडे रवाना.

अकोला : शहराची पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा तिढा सुटण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. या मुद्दय़ावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या दालनात २0 जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली असून, याकरिता सोमवारी सायंकाळी मनपाचे अधिकारी मुंबईकरिता रवाना झाले. शहराला महान धरणातून पाणीपुरवठा केला जातो. २00७ पर्यंत अकोलेकरांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यंत्रणेकडून पाणीपुरवठा केला जात होता. तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर रोकडे यांनी पाणीपट्टी वसुलीपासून मनपाला मोठे आर्थिक उत्पन्न प्राप्त होईल, या उद्देशातून २00७ मध्ये ही योजना मनपाकडे वळती केली. अवैध नळ कनेक्शनची वाढती संख्या व थकीत पाणीपट्टीमुळे मनपाच्या या योजनेला घरघर लागली. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील पम्पिंग मशीन कालबाह्य झाल्याने त्यामध्ये सातत्याने तांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण वाढले. यामुळे पाणीपुरवठय़ाचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे ही योजना मजीप्राकडे हस्तांतरित करण्यासाठी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी विधिमंडळात अनेकदा लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन पाणीपुरवठामंत्री लक्ष्मणराव ढोबळे, दिलीप सोपल यांच्यासोबत आ. बाजोरिया यांनी मनपा व मजीप्राच्या अधिकार्‍यांमध्ये समन्वय घडवून आणल्यानंतर मनपाचे तत्कालीन आयुक्त दीपक चौधरी यांनी ही योजना मजीप्राकडे हस्तांतरित करण्याचा ठराव शासनाकडे पाठवला होता. सुरुवातीला ही योजना स्वीकारण्याची तयारी दर्शविणार्‍या मजीप्राने कालांतराने मात्र केवळ महान येथील जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल-दुरुस्तीचा प्रस्ताव समोर ठेवला. यामुळे हस्तांतरणाचा मुद्दा बाजूला सारला गेला. आता पुन्हा ही योजना स्वीकारण्याची तयारी मजीप्राने दाखवल्याची माहिती आहे. त्यानुषंगाने पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या दालनात मनपा व मजीप्राच्या संबंधित अधिकार्‍यांची बैठक आयोजित केली आहे. मनपाचे शहर अभियंता अजय गुजर व जलप्रदाय विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुनील काळे सोमवारी सायंकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत.