शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

कर्जमाफीच्या अर्जांचे आजपासून चावडी वाचन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:28 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी ऑनलाइन भरलेल्या कर्जमाफीच्या अर्जांचे जिल्हय़ातील गावागावांत २७ सप्टेंबरपासून चावडी वाचन करण्यात येणार आहे. चावडी वाचन करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ८३५ कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली असून, या कर्मचार्‍यांना मंगळवारी तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले. 

ठळक मुद्दे८३५ कर्मचार्‍यांची नेमणूक कर्मचार्‍यांना दिले प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी ऑनलाइन भरलेल्या कर्जमाफीच्या अर्जांचे जिल्हय़ातील गावागावांत २७ सप्टेंबरपासून चावडी वाचन करण्यात येणार आहे. चावडी वाचन करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ८३५ कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली असून, या कर्मचार्‍यांना मंगळवारी तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले.  सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरण्यात आले. कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत २२ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत होती. त्यानुसार जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) व आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी सेतू केंद्रांवर गत २४ जुलै ते २२ सप्टेंबरपर्यंत थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. मुदतीपर्यंत जिल्हय़ात १ लाख ३८ हजार ९६२ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जाचे चावडी वाचन जिल्हय़ातील गावागावांत २७ व २८ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये होणार्‍या चावडी वाचनात कर्जमाफीसाठी अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांचे वाचन करण्यात येणार आहे. चावडी वाचन करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध विभागाच्या ८३५ कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांना २६ सप्टेंबर रोजी जिल्हय़ातील तालुका स्तरावर चावडी वाचनाचे प्रशिक्षण देण्यात आले.

कर्जमाफीसाठी अपात्र दर्शविण्यात आलेले शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याचा पुरावा सादर करू शकतील. कर्जमाफी योजनेपासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी चावडी वाचन करून त्रुटींचे निरासन करण्यात येणार आहे. याचा लाभ शेतकर्‍यांनी अवश्य घ्यावा, त्यासाठी चावडी वाचनास उपस्थित राहावे,- डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री, अकोला -