शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कर्जमाफीच्या अर्जांचे आजपासून चावडी वाचन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:28 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी ऑनलाइन भरलेल्या कर्जमाफीच्या अर्जांचे जिल्हय़ातील गावागावांत २७ सप्टेंबरपासून चावडी वाचन करण्यात येणार आहे. चावडी वाचन करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ८३५ कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली असून, या कर्मचार्‍यांना मंगळवारी तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले. 

ठळक मुद्दे८३५ कर्मचार्‍यांची नेमणूक कर्मचार्‍यांना दिले प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी ऑनलाइन भरलेल्या कर्जमाफीच्या अर्जांचे जिल्हय़ातील गावागावांत २७ सप्टेंबरपासून चावडी वाचन करण्यात येणार आहे. चावडी वाचन करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ८३५ कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली असून, या कर्मचार्‍यांना मंगळवारी तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले.  सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरण्यात आले. कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत २२ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत होती. त्यानुसार जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) व आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी सेतू केंद्रांवर गत २४ जुलै ते २२ सप्टेंबरपर्यंत थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. मुदतीपर्यंत जिल्हय़ात १ लाख ३८ हजार ९६२ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जाचे चावडी वाचन जिल्हय़ातील गावागावांत २७ व २८ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये होणार्‍या चावडी वाचनात कर्जमाफीसाठी अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांचे वाचन करण्यात येणार आहे. चावडी वाचन करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध विभागाच्या ८३५ कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांना २६ सप्टेंबर रोजी जिल्हय़ातील तालुका स्तरावर चावडी वाचनाचे प्रशिक्षण देण्यात आले.

कर्जमाफीसाठी अपात्र दर्शविण्यात आलेले शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याचा पुरावा सादर करू शकतील. कर्जमाफी योजनेपासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी चावडी वाचन करून त्रुटींचे निरासन करण्यात येणार आहे. याचा लाभ शेतकर्‍यांनी अवश्य घ्यावा, त्यासाठी चावडी वाचनास उपस्थित राहावे,- डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री, अकोला -