शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

कर्जमाफीच्या अर्जांचे आजपासून चावडी वाचन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:28 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी ऑनलाइन भरलेल्या कर्जमाफीच्या अर्जांचे जिल्हय़ातील गावागावांत २७ सप्टेंबरपासून चावडी वाचन करण्यात येणार आहे. चावडी वाचन करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ८३५ कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली असून, या कर्मचार्‍यांना मंगळवारी तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले. 

ठळक मुद्दे८३५ कर्मचार्‍यांची नेमणूक कर्मचार्‍यांना दिले प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी ऑनलाइन भरलेल्या कर्जमाफीच्या अर्जांचे जिल्हय़ातील गावागावांत २७ सप्टेंबरपासून चावडी वाचन करण्यात येणार आहे. चावडी वाचन करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ८३५ कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली असून, या कर्मचार्‍यांना मंगळवारी तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले.  सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरण्यात आले. कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत २२ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत होती. त्यानुसार जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) व आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी सेतू केंद्रांवर गत २४ जुलै ते २२ सप्टेंबरपर्यंत थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. मुदतीपर्यंत जिल्हय़ात १ लाख ३८ हजार ९६२ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जाचे चावडी वाचन जिल्हय़ातील गावागावांत २७ व २८ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये होणार्‍या चावडी वाचनात कर्जमाफीसाठी अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांचे वाचन करण्यात येणार आहे. चावडी वाचन करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध विभागाच्या ८३५ कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांना २६ सप्टेंबर रोजी जिल्हय़ातील तालुका स्तरावर चावडी वाचनाचे प्रशिक्षण देण्यात आले.

कर्जमाफीसाठी अपात्र दर्शविण्यात आलेले शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असल्याचा पुरावा सादर करू शकतील. कर्जमाफी योजनेपासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी चावडी वाचन करून त्रुटींचे निरासन करण्यात येणार आहे. याचा लाभ शेतकर्‍यांनी अवश्य घ्यावा, त्यासाठी चावडी वाचनास उपस्थित राहावे,- डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री, अकोला -