शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

चार वर्षांंचा शुल्क परतावा शासनाकडे थकीत!

By admin | Updated: March 4, 2016 02:20 IST

मेस्टाचा २५ टक्के प्रवेश प्रक्रियेवर बहिष्काराचा निर्णय.

अकोला: शिक्षण हक्क कायद्यानुसार गोरगरिबांच्या मुलांना नामांकित इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता आणि या मुलांच्या शिक्षणाचे शुल्क राज्य शासन शिक्षण संस्थांना देणार होते. त्यानुसार चार वर्षांंपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये गोरगरीब मुलांना २५ टक्क्यानुसार प्रवेश देण्यात आला; परंतु चार वर्षांंपासून शासनाने या मुलांच्या शिक्षणाचा शुल्क परतावा इंग्रजी माध्यमांच्या शाळांना दिलेला नाही. त्यामुळे येत्या २0१५ व १६ शैक्षणिक वर्षामध्ये २५ टक्के प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने घेतला आहे. गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, कामगारांच्या मुलांना नामांकित इंग्रजी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण घेता यावे. या उद्देशाने राज्य शासनाने शिक्षणहक्क कायद्यानुसार, २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी प्रतिसाद दिला आणि गोरगरीब विद्यार्थ्यांंना शाळेत प्रवेश दिला. त्यांच्या शिक्षणाचा शुल्क परतावा शासनाने इंग्रजी माध्यमाच्या शाळांना देण्याचे मान्य केले होते; परंतु गत चार वर्षांंपासून इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मुलांच्या शिक्षणाचा शुल्क परतावा मिळालाच नाही, त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांंमध्ये गोरगरीब मुलांना शाळेत कसा प्रवेश द्यावा. त्यांना मोफत प्रवेश दिला तर शाळांना त्यांच्यावरील शिक्षणाचा भार उचलावा लागतो. हा खर्च इंग्रजी माध्यमांच्या शाळांना झेपत नसल्याने, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकार्‍यांना वारंवार निवेदने दिली. त्यांच्याकडे शुल्क परतावा देण्याची मागणी केली; परंतु राज्य शासनाने त्याकडे कायमचे दुर्लक्ष केले. राज्यातील इतर जिल्हय़ांमधील इंग्रजी शाळांना शुल्क परतावा देण्यात आलेला आहे; परंतु केवळ अकोला जिल्हय़ातच हा परतावा न मिळाल्याने मेस्टाने बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. मेस्टाने घेतलेला निर्णय प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांना कळविण्यात आला आणि जोपर्यंंत इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या बँक खात्यात शुल्क परतावाची रक्कम जमा होणार नाही, तोपर्यंंत जिल्हय़ातील एकही इंग्रजी माध्यमाची शाळा २५ टक्केनुसार प्रवेश प्रक्रिया राबविणार नाही. शासनाकडून पुरेसा निधी आल्यानंतरही जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक शाळांना शुल्क परतावा देण्यास दिरंगाई करीत असल्याचा आरोप मेस्टाने केला आहे.