शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

दररोज चार क्विंटल फुले फेकून देण्याची वेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:16 IST

रिॲलिटी चेक अकोला : काही दिवसांपासून शासनाने लावलेल्या कडक निर्बंधांमुळे फुल व्यवसायाचे अर्थचक्र कोलमडले आहे. शेतमालांसह फुलबाजार ठप्प झाला ...

रिॲलिटी चेक

अकोला : काही दिवसांपासून शासनाने लावलेल्या कडक निर्बंधांमुळे फुल व्यवसायाचे अर्थचक्र कोलमडले आहे. शेतमालांसह फुलबाजार ठप्प झाला आहे. खरेदीदार मिळत नसल्याने ऐन हंगामात येथील फुल बाजारात दररोज अंदाजे चार-पाच क्विंटल फुले फेकून देण्याची वेळ आली आहे. आवक २२-२३ क्विंटलवरून १०-१२ क्विंटलवर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फुल व्यवसाय चांगलाच अडचणीत आला आहे. सुरुवातीला चार-पाच महिने लाॅकडाऊनमध्ये फुलाला कोणी खरेदीदार नसल्याने शेतकऱ्यांनी फुले फेकून दिली होती. मध्यंतरी काही दिवस अर्थचक्राची गाडी रुळावर आल्याने फुल विक्री वाढली; परंतु पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने कठोर निर्बंध लावले आहे. त्यामुळे धार्मिक उत्सव, लग्न सोहळे, कार्यक्रम, मंदिरे बंद आहेत तर मंदिरात लागणाऱ्या फुलांची मागणीही नगण्य आहे. यामुळे फुलांची मागणी थांबली आहे. फुलांचा व्यवसाय करणारे व्यापारी आणि फुल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले आहे. बाजारात सध्या फुलांना मागणी अत्यंत कमी आहे. व्यापाऱ्यांनी प्रयत्न करूनही फुलांची विक्री होत नाही. बाजारात सकाळी विक्रीला आलेली फुले दुपारनंतर खराब होतात. सायंकाळी खराब झालेली फुले फेकून द्यावी लागत. दरवर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांनी उत्पादन कमी केले आहे. तसेच आलेला माल विकण्याचा ताण आहे. सध्या जवळपास ७० टक्क्यांनी मागणी कमी झाली असल्याचे अडत दुकानदारांनी सांगितले.

--बॉक्स--

हंगामातही दर मिळेना!

फुले आताचे दर मागील दर

गुलाब ३०-४० किलो १००-१५० किलो

चायनिज गुलाब ४० रु. बंडल १००-१५० रु.बंडल

लिली १० चे ५ बंडल ७०-८० चे ५ बंडल

जरबेरा १०-२० बंडल ३० बंडल

मोगरा १५-२० पाकिट ७०-८० पाकीट

निशीगंध ४०-५० किलो १००-१५० किलो

गिलाडी १० किलो ३० किलो

जरबेरा १० रु. बंडल ३० रु.बंडल

--कोट--

शासनाने फुलाला अत्यावश्यक सेवेत घ्यावे, फुले कच्च्या मालात मोडत असून नाशवंत आहे. सकाळी आलेली फुले सायंकाळपर्यंत खराब होतात. फळ, भाजीपाला प्रमाणे फुलांच्या विक्रीवरील बंधने दूर करावी.

प्रमोद लांजेवार, अध्यक्ष, अकोला जिल्हा फ्लॉवर असोसिएशन

--कोट--

कोरोनामुळे फुलांचा व्यवसाय निम्म्यापेक्षा जास्त घटला आहे. लॉकडाऊनआधी बाजारात २५-३० क्विंटल माल येत होता. निर्बंधांमुळे मागणी कमी आहे. कोरोनाची स्थिती पाहता शेतकऱ्यांनी लागवडही कमी केली आहे.

नीलेश फुलारी, अडत दुकानदार

--कोट--

मागील १५ वर्षांपासून फुल शेती करीत आहे. कोरोना काळाआधी ६-७ लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळत होते; मात्र आता दर घसरले आहे. गाडी भरून बाजारात घेऊन जाण्यासाठी परवडत नाही. मजुराचा खर्चही निघत नाही. त्यामुळे येत्या वर्षात फुलाऐवजी भाजीपाला लागवडीचा पर्याय निवडला आहे.

उमेश फुलारी, शेतकरी, पातूर

--बॉक्स--

जिल्ह्यात फुलविक्रेता

११२

दररोजची आवक

१०-१२ क्विंटल

एवढी मागणी घटली

६०-७० टक्के