शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

पावसाअभावी शेतमजुरांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:13 IST

पातूर तालुक्यात ४५ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी खरिपासाठी पेरणी होत असते. यावर्षी तालुक्यात निम्म्याहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली ...

पातूर तालुक्यात ४५ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी खरिपासाठी पेरणी होत असते. यावर्षी तालुक्यात निम्म्याहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली नाही. त्याबरोबरच निम्म्या क्षेत्रावर पेरणी झाल्यानंतर गेल्या दोन आठवड्यापासून अजून पाऊस आला नाही. त्यामुळे शेतमजुरांना शेतीची कामे ठप्प असल्यामुळे कामच मिळत नाही. परिणामी शेतमजुरांवर उपासमारीची वेळी आली आहे. पातूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रात होणाऱ्या कामांवर मजुरी करणारा मोठा वर्ग आहे, त्या मजूर वर्गाचे कुटुंब मजुरीच्या भरोशावर चालत असते. मजुरांच्या हाताला कामच नसल्यामुळे मजुरांचे कुटुंब बेरोजगार झाले आहे.

ग्रामीण रोजगार हमी योजना केवळ नावालाच!

मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजना असताना, कोणत्याही प्रकारचे काम पातूर तालुक्यात चालू नसल्याने या योजनेचा लाभ बहुतांशी मजुरांना घेता येत नाही. पंचायत समिती स्तरावर या योजनेसाठी स्वतंत्र विभाग उभारण्यात आलेला आहे. मात्र विभागाने मजुरांच्या हाताला काम दिले नाही. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाची महत्त्वपूर्ण योजना केवळ नावालाच असल्याचे दिसून येत आहे.

पंचायत समिती स्तरावर महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरू करण्यात यावी. खरिपात पावसाअभावी कामे थांबली आहेत. मजुरांच्या हातांना रोहयोंतर्गत तातडीने कामे देण्यात यावी.

-बाळकृष्ण वसतकार, शेतकरी चरणगाव

फोटो:

070721\img_20210707_164559.jpg

बाळकृष्ण वसतकार चरणगांव