शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कपाशी पीक मोडून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

खेट्री : पातुर तालुक्यातील पिंपळखुटा परिसरात कपाशी पिकावर अज्ञात रोगाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. ...

खेट्री : पातुर तालुक्यातील पिंपळखुटा परिसरात कपाशी पिकावर अज्ञात रोगाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिंपळखुटा परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कपाशी पिकांची पेरणी केली होती. कपाशीचे बियाणे चांगले उगवले, परंतु अज्ञात रोगाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी पीक मोडून सोयाबीन पिकाची दुबार पेरणी केली आहे.

पिंपळखुटा येथील गजानन बाबाराव देशमुख यांनी पंधरा एकर, रवींद्र महादेव देशमुख यांनी चार एकर, पुंडलिक लक्ष्मण दांदळे दोन एकर, गोपाल कवळे व नाजूकराव देशमुख आदी शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कपाशी पिकांची पेरणी केली होती. परंतु अज्ञात रोगाच्या थैमानामुळे या शेतकऱ्यांनी कपाशी पीक मोडून सोयाबीन पिकाची दुबार पेरणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. आधी चार ते पाच वर्षांपासून सतत नापिकीमुळे व अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या विविध पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा दरवर्षी वाढत आहे. मागील वर्षाच्या कर्जाची परतफेड यावर्षी होईल, या आशेवर शेतकरी बँक व खासगी सावकाराकडून कर्ज काढून पिकांची पेरणी करीत आहेत. मात्र दरवर्षी काहीना काही शेतकऱ्यांवर संकट निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा दरवर्षी वाढतच चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना झालेली नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

पिंपळखुटा परिसरात कपाशी पिकावर अज्ञात रोग आल्याची माहिती मिळताच भेट देऊन कपाशी पिकाची पाहणी केली असून, औषध फवारणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. तसेच नुकसान भरपाईची तरतूद नाही, तरीही वरिष्ठांना माहिती देण्यात येईल.

- धनंजय शेटे, तालुका कृषी अधिकारी, पातूर

पिकांची पेरणी करण्याआधी कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्याची गरज आहे. परंतु पिंपळखुटा येथे पेरणीपूर्वी मार्गदर्शन करण्यात आले नाही.

- पुंडलिक लक्ष्मण दांदळे, शेतकरी, पिंपळखुटा

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी पंधरा एकरामध्ये कपाशी पिकाची पेरणी केली. परंतु अज्ञात रोग आल्याने कपाशी मोडून दुबार पेरणी केली आहे. त्यामुळे कपाशी पिकाच्या पेरणीसाठी केलेला दीड लाखांचा खर्च पाण्यात गेला आहे.

- गजानन देशमुख, शेतकरी, पिंपळखुटा