शहरं
Join us  
Trending Stories
1
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अफगाणिस्तानेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
3
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
4
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
5
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
6
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
7
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
8
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
9
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
11
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
12
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
13
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
14
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
15
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
16
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
17
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
18
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
19
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
20
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

दोनशे टक्क्यांचा चुना लावून आता संचालकच काढणार निविदा

By admin | Updated: May 22, 2017 01:50 IST

शालेय पोषण आहार योजनेच्या निविदा प्रक्रियेत अशीही पारदर्शकता

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शालेय पोषण आहार योजनेतून तांदूळ वगळता इतर वस्तूंसाठी बाजारभावापेक्षा तब्बल दोनशे टक्के दराला मंजुरी देत शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार गेल्यावर्षी घडला. ‘लोकमत’ने ठळकपणे मांडलेली ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करण्याचे त्यांनी बजावले. त्यात काहीच फरक पडलेला नाही. गेल्यावर्षी घोळ करणाऱ्या शिक्षण संचालकांकडून केंद्रीय पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असल्याने पारदर्शेकतेवर आतापासूनच प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्यावर्षी पोषण आहार पुरवठ्याचे नऊ जिल्ह्यांतील काम महाराष्ट्र स्टेट को-आॅप. कंझ्युमर्स फेडरेशनला निविदेतून देण्यात आले. वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी शिक्षण संचालकांनी फेडरेशनसोबत करारनामा केला. त्या करारनाम्यात पोषण आहारात पुरवठा करावयाचे कडधान्य, डाळी, मसाले, मीठ, मिरची या वस्तूंचे दर ठरवले. ते दर बाजारभावापेक्षा दोनशे टक्के अधिक होते. आदिवासी विकास विभागाकडे पुरवठा होणाऱ्या त्याच वस्तूंच्या दराशी केलेल्या तुलनेतूनही ते निष्पन्न झाले होते. विशेष म्हणजे, पुणे येथील शिक्षण संचालनालयाने कंझ्युमर्स फेडरेशनला काम करण्यासाठी १३ जून २०१६ पासून आदेश देणे सुरू केले. त्यापूर्वी बाजार सर्वेक्षण समितीचा अहवाल कोणी दिला, याबाबत शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी कमालीची गोपनीयता ठेवली होती. आदिवासी विकास विभागाने निविदा प्रक्रियेतूनच दिलेल्या कामाचा आदेश ३० जुलै २०१६ पासून देण्यात आला. कामाचा आदेश देण्याचा कालावधी पाहता ४५ दिवसांआधी वस्तूंचे दर एवढे प्रचंड कसे काय, त्यानंतर बाजारातील वस्तू कमालीच्या स्वस्त झाल्या काय, याबाबत शिक्षण विभाग मौन होता. अमरावती विभाग अपर आयुक्तांच्या कार्यक्षेत्रातील बारा जिल्ह्यांत एकाच दराने वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. त्यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे शिक्षण संचालकांनी नऊ जिल्ह्यांत शासन निधीची अक्षरश: खिरापत वाटल्याचे स्पष्ट झाले.