शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
3
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
4
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
5
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
6
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
7
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
8
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
9
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
10
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
11
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
12
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
13
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
14
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
15
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
16
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
17
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
18
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
19
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
20
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

राज्यातील सेवानवृत्त नगर परिषद कर्मचा-यांचे १८७ कोटी थकीत

By admin | Updated: January 8, 2015 00:32 IST

नगर परिषद संचालनांच्या आयुक्तांनी अल्टिमेटम देऊनही परिस्थिती जैसे थे.

मंगरूळपीर (वाशिम) : नवृत्तीनंतर दिल्या जाणार्‍या विविध प्रकारच्या आर्थिक लाभापोटी राज्यभरातील नगर परिषद सेवानवृत्त कर्मचार्‍यांचे १८७.९ कोटी रूपये शासनाकडे थकित आहेत. याप्रकरणी काही सेवानवृत्त कर्मचार्‍यांनी न्यायालयात दाद मागितल्याने नगर परिषद संचलनालयाच्या आयुक्तांना न्यायालयासमोर हजर राहावे लागले होते. त्यापृष्ठभूमिवर सेवानवृत्त कर्मचार्‍यांच्या लाभाची रक्कम चार टप्प्यांमध्ये अदा करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व नगर परिषदांना दिले असले तरी, या आदेशाचेही पालन नगर परिषदांकडून होत नसल्याचे दिसत आहे. राज्यातील नगर परिषद कर्मचार्‍यांना सेवानवृत्तीनंतरचे आर्थिक लाभ निर्धारित मुदतीत अदा करण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित नगर परिषदांची आहे; परंतु राज्यात याच्या विपरित परिस्थिती दिसून येत आहे. नगर परिषद कर्मचारी सेवानवृत्त झाल्यानंतरही त्यांच्या हक्काचा आर्थिक लाभ वेळेवर मिळत नसल्यामुळे राज्यातील हजारो कर्मचारी आर्थिक हलाखीचा सामना करीत आहेत. यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नगर परिषद प्रशासन संचलनालयाने पाहणी केली. त्यानुसार मे २0१४ पर्यंत राज्यातील सेवानवृत्त नगर परिषद कर्मचार्‍यांचे १८७.९ कोटी रूपये थकित असल्याचे स्पष्ट झाले. सर्व नगर परिषदांनी त्यांच्या सेवानवृत्त कर्मचार्‍यांना लाभाची ही रक्कम नोव्हेंबर २0१४, १४ जानेवारी २0१५, ३१ मार्च २0१५ आणि ३१ मार्च २0१६ या चार टप्प्यात अदा करण्याचे आदेश नगर परिषद संचलनालयाच्या आयुक्तांनी दिले होते. त्यासाठी नगर परिषदांनी मालमत्ता क र व पाणीपट्टीची वसुली ९0 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त करण्यासाठी उपाययोजना करणे अपेक्षित होते. लाभाची रक्कम चार टप्प्यांमध्ये दिल्यानंतरही, आणगी थकित निघाल्यास २0१५- १६ या आर्थिक वर्षाकरीता १३ व्या वित्त आयोगातून प्राप्त होणार्‍या निधीतून ५0 टक्के निधी सेवानवृत्त कर्मचार्‍यांचे लाभ देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या मान्यतेने वापरावा, अशा सूचनाही आयुक्तांनी केल्या आहेत. नगर परिषद संचलनालयाने १८ ऑक्टोबर २0१४ रोजी दिलेल्या या आदेशाला राज्यातील नगर परिषदांनी केराची टोपली दाखवली. आयुक्तांच्या आदेशानुसार नगर परिषदांनी सेवानवृत्त कर्मचार्‍यांना लाभाचा पहिला टप्पा नोव्हेंबर २0१४ मध्ये देणे अपेक्षित होते; मात्र या पहिल्या टप्प्यातही सेवानवृत्तांच्या पदरी निराशाच आली. आता दुसरा टप्पा अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला असून, यावेळी तरी आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा सेवानवृत्त कर्मचार्‍यांकडून व्यक्त होत आहे.