शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

अज्ञात तापाचे थैमान; १५ दिवसात १५ गुरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:15 IST

तेल्हारा: तालुक्यातील जाफ्रापूर येथे अज्ञात तापाचे थैमान सुरू असून, १५ दिवसात तब्बल १५ गुरांचा मृत्यू झाला आहे. ...

तेल्हारा: तालुक्यातील जाफ्रापूर येथे अज्ञात तापाचे थैमान सुरू असून, १५ दिवसात तब्बल १५ गुरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गाय, बैल, म्हैस, शेळीसह इतर गुरांचा समावेश आहे. परिसरातील गुरांमध्ये या तापाची लक्षणे दिसून येत असल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन आजारी गुरांवर उपचार करावा तसेच पशुपालकांना झालेल्या नुकसानापोटी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तेल्हारा विकास मंचने दि.२ एप्रिल रोजी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

तेल्हारा तालुक्यातील जाफ्रापूर येथे अज्ञात तापाची साथ पसरली असून, पशुपालक हैराण झाले आहेत. अज्ञात तापाने १५ दिवसात १५ गुरांचा मृत्यू झाला असून, अनेक गुरे आजारी असल्याचे चित्र आहे. मृत्यूमध्ये गाय, बैल, म्हैस व शेळी यांच्यासह गुरांचा समावेश असल्याने पशुपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अज्ञात तापाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जाफ्रापूर परिसरातील पशुपालक, शेतकरी धास्तावले आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शेतकरी, शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहेत. शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच आता जाफ्रापूर येथे अज्ञात तापाचा कहर सुरू आहे. गुरांच्या रक्षणासाठी पशुधन विकास अधिकारी लक्ष ठेवून आहेत, परंतु त्यांचे उपचार कुचकामी ठरत असल्याचे पशुपालकांमध्ये बोलल्या जात आहे. तसेच बैलांमध्ये खुरी आजाराचे प्रमाण वाढले आहे. जाफ्रापूर येथील महादेवराव साबळे यांची दोन गुरे, जनार्धन बोदडे यांचे दोन गोऱ्हे, रामदास शेगोकार यांचा एक गोऱ्हा, गजानन साबळे यांची एक, गजानन वसो यांचा एक, गोपाळा बोदळे यांचे तीन व दोन गायी, संतोष बोदळे यांची एक शेळी असे, एकूण १५ गुरांचा मृत्यू झाला आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी

गुरांना वाचविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर विनाविलंब प्रयत्न करण्याची आवश्यकता असून, शासनाने पशुपालकांना विनाविलंब आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी विकास मंचने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी तेल्हारा विकास मंचचे अध्यक्ष राम फाटकर, स्वप्नील सुरे, मोहन श्रीवास, नितीन मानकर, सोनू सोनटक्के, गौतम दामोदर, गणेश पवार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनाच्या प्रतिलिपी ना. बच्चुभाऊ कडू पालकमंत्री अकोला यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत.