शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडून मायलेकीसह तीन ठार, चार जण जखमी

By admin | Updated: October 3, 2015 02:40 IST

परतीच्या पावसाची अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, तर वाशिम जिल्ह्यात दमदार हजेरी.

अकोला : परतीच्या पावसाने अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, तर वाशिम जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात वीज कोसळून मायलेकीसह तीन जण ठार, तर चार जण जखमी झाले. वाशिम जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. रिसोड तालुक्यातील किनखेडा येथील राजेश पांडूरंग देशमुख यांच्या शेतात सोयाबिन काढणीचे काम सुरू झाल्याने, अचानक पावसाला सुरूवात झाल्याने, शेत मालक व पाच मजूर शेतातीलच झाडाखाली छत्री घेवून उभे होते. त्याचवेळी झाडावर वीज कोसळली. या झाडाखाली किनखेडा येथील संगीता राजेश देशमुख (वय ४५), रितेश राजेश देशमुख (वय १३), दुर्गा किसन अवचार (वय ५५) आणि पेडगाव येथील रूपाली मोहन अंभोरे (वय १२) व उज्वला मोहन अंभोरे (वय ४५), रचना राजू तुरूकमाने (वय ३0) हे सहा जण उभे होते. त्यापैकी उज्वला मोहन अंभोरे आणि त्यांची मुलगी रचना राजू तुरूकमाने यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण जखमी झाले. सर्वांना रिसोड येथील ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी दोघींना मृत घोषित केले. चार जखमींवर वाशिम येथे उपचार सुरू आहेत. रचना राजू तुरूकमाने ही मेहकर तालुक्यातील परतापूर येथील रहिवासी असून, ती पेडगाव येथे माहेरी आली होती. ती आईसोबत शेतात मजुरीला गेली असता, दोघींचाही वीज पडल्याने मृत्यू झाला. वीज कोसळून एका शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची दुसरी घटना वाशिम जिल्ह्यातील अडोळी येथे दुपारी घडली. अडोळी येथील शेतकरी रामदास तुकाराम इढोळे (वय ४५) हे शेतात सोयाबिन काढणीचे काम करीत असताना, दुपारी ४ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतातील मजूर कुटाराच्या ढिगाजवळ जावून उभे राहीले, तर रामदास इढोळे यांनी एका झाडाखाली आश्रय घेतला. त्याचवेळी वीज पडल्याने इढोळे यांचा मृत्यू झाला.