शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

चा-याअभावी आणखी तीन गायी मरणासन्न अवस्थेत

By admin | Updated: June 12, 2016 02:18 IST

चारा टंचाईमुळे महादेव गौरक्षणात आणखी तीन गायींची प्रकृती खालावली.

नांदुरा (जि. बुलडाणा): आधीच चार दिवसात चारा टंचाईमुळे पाच गायींचा मृत्यू झालेल्या नांदुरा शहराजवळील खामगाव तालुक्यातील आमसरी शिवारात असलेल्या महादेव गौरक्षणात ११ जूनच्या दुपारी आणखी तीन गायींची प्रकृती खालावली असून ५६0 गायी असलेल्या या गौरक्षणात चारा टंचाईमुळे शेकडो गायी मृत्यूच्या दाढेत अडकल्या आहेत; मात्र आजही चारा छावणी देण्याची जबाबदारी असणारे जिल्हाधिकारी कार्यालय ढिम्म पडले आहे.२५0 पेक्षा जास्त गायी असणार्‍या गौरक्षण संस्थेला चारा छावनी देण्याबाबत किंवा चार्‍यासाठी अनुदान देण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार मागील दोन महिन्यांपासून महादेव गौरक्षण संस्थान नांदुरा हे जिल्हाधिकारी कार्यालयाचे ओटे झिजवत आहे; मात्र अद्यापही या कार्यालयाने चारा छावणी दिली नाही. संस्थानने जिल्हा व राज्याबाहेरून चारा विकत आणला; मात्र आता चारा विकत मिळत नसल्याने मोठी चारा टंचाई निर्माण झाली आहे. आज रोजी गौरक्षणातील शेकडो गायी मृत्यूच्या दाढेत ओढल्या गेल्या असून त्यापैकी पाच गायींचा मृत्यू झाला असून आता नव्याने तीन गायी प्रकृती खालावली असून त्या मरणासन्न अवस्थेत पोहचल्या आहेत. पाऊस आल्यानंतरही सुमारे दोन महिन्यानंतर चारा उपलब्ध होणार आहे. तोपर्यंंत ५६0 गायींना चारा कसा उपलब्ध करावा, या चिंतेने संस्थानचे संचालक चिंताग्रस्त झाले आहेत. यापूर्वी पाच गायींचा मृत्यू झाला. तर आता तीन गायी नव्याने मरणासन्न अवस्थेत पोहचल्याने चारा छावणी किंवा अनुदान देण्यासाठी आणखी किती गायींचा बळी जिल्हा प्रशासनाला हवा आहे. असा संतप्त प्रश्न गोभक्तांना सतावत आहे. वातानुकूलित कॅबीनमध्ये आरामदायी खुर्चीवर बसणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांना चार्‍याअभावी उपासमारीने मरणासन्न अवस्थेतील गायींचे दु:ख समजणे अवघड आहे. त्यामुळेच चारा छावणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातील फाईलीमध्ये अडकला आहे.