शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

तीन लाखांवर जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर!

By admin | Updated: June 9, 2016 01:58 IST

अकोला जिल्ह्यात चारा डेपो केव्हा उघडणार याबाबत शेतक-यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

संतोष येलकर / अकोलादुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात चारा टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, ३ लाख १४ हजार ८९७ जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे जनावरांना जगविण्यासाठी प्रशासनामार्फत चारा डेपो केव्हा उघडले जाणार, याबाबत जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने पिकांचे उत्पादन बुडाले. जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत विविध भागांमध्ये भीषण पाणी टंचाईसह चारा टंचाई निर्माण झाली. सन २0१२ च्या पशुगणनेनुसार, जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय लहान ७४ हजार ७0२ आणि मोठे २ लाख ४0 हजार १९५ असे एकूण ३ लाख १४ हजार ८९७ पशुधन आहे. नापिकीच्या स्थितीत चारा उत्पादनाच्या प्रमाणात प्रचंड घट झाली. त्यामुळे निर्माण झालेल्या चारा टंचाईच्या परिस्थितीत जनावरांना जगविण्यासाठी चारा आणणार कोठून, असा प्रश्न जिल्ह्यातील गावागावांत शेतकर्‍यांपुढे निर्माण झाला. चारा नसल्याने शेतकर्‍यांवर जनावरे विकण्याची वेळ आली. दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी लागणारा चारा उपलब्ध नसल्याने, जिल्ह्यातील विविध भागात जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त भागात जनावरांसाठीचारा डेपो उघडण्याची उपाययोजना प्रशासनामार्फत केव्हा करण्यात येणार, याबाबत जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून प्रतीक्षा केली जात आहे. पशुसंवर्धन विभाग प्रस्ताव केव्हा सादर करणार?जिल्ह्यातील विविध भागात चारा टंचाईचा प्रश्न गंभीर झाला असला तरी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या दाव्यानुसार, जून अखेरपर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे; परंतु गावागावांत निर्माण झालेल्या चाराटंचाईची स्थिती बघता, टंचाईग्रस्त भागात जनावरांसाठी चारा डेपो उघडण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे केव्हा सादर करण्यात येणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.