शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
3
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
4
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
5
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
6
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
7
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
8
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
9
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
10
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
11
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
12
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
13
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
14
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
15
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
16
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
17
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
18
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
19
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
20
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...

तीन लाख शेतक-यांना मिळणार मदतीचा आधार

By admin | Updated: December 12, 2014 01:25 IST

‘पॅकेज’ जाहीर झाल्याने जिल्ह्यातील शेतक-यांना दिलासा.

संतोष येलकर / अकोलाअत्यल्प पाऊस, हातून गेलेली पिके आणि नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांकडून सरकारी मदतीची प्रतीक्षा केली जात असतानाच, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी अखेर गुरुवारी राज्य सरकारमार्फत सात हजार कोटी रुपयांचे ह्यपॅकेज ह्णजाहीर करण्यात आले. सरकारी मदतीच्या या पॅकेजमध्ये जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त २ लाख ९७ हजार २२१ शेतकर्‍यांना मदतीचा आधार मिळणार आहे.यावर्षीच्या पावसाळय़ात तब्बल दीड महिना पावसाने मारलेली दांडी आणि त्यानंतर अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यात खरीप हंगामात मूग, उडिदाचे पीक शेतकर्‍यांच्या हातून गेले. दुबार-तिबार पेरणी करूनही अनेक भागात सोयाबीनचे पीक उगवले नाही. उगवलेल्या सोयाबीन पिकाचे एकरी ५0 किलो ते एक क्विंटलपर्यंत उत्पादन झाले. सोयाबीन सोबतच कपाशी पिकांच्या उत्पादनातही कमालीची घट झाली. रब्बी पिकांची पेरणी करण्यात आली; मात्र पावसाअभावी जमिनीतील ओल खोल खेल्याने, रब्बी पिकांचेही काही खरे नसल्याने नापिकीच्या परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. सर्वच पिकांचे उत्पादन बुडाल्याने, नापिकीच्या परिस्थितीत जिल्ह्यातील सातही तालुक्यातील सर्वच गावांची खरीप पिकांची सरासरी पैसेवारी केवळ ४१ पैसे आहे. त्यामुळे जिल्हय़ातील दुष्काळी परिस्थितीचे चित्र स्पष्ट झाले. यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण ४ लाख १८ हजार ९१४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली. त्यापैकी तब्बल ४ लाख १६ हजार ७९५ हेक्टर ९२ आर क्षेत्रावरील पिकांचे क्षेत्र बाधित झाले. त्यामध्ये जिरायती, बागायती आणि फळपिकांच्या क्षेत्राचा समावेश आहे. पिके हातून गेल्याने जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारकांसह जिल्ह्यातील २ लाख ९७ हजार २२१ शेतकर्‍यांना नापिकीचा फटका बसला. नापिकीमुळे दुष्काळी दुष्टचक्रात सापडल्याच्या स्थितीत सरकारकडून मदतीचा आधार केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा शेतकर्‍यांकडून केली जात असतानाच, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारकडून सात हजार कोटींचे ह्यपॅकेजह्ण जाहीर करण्यात आले. सरकारच्या या पॅकेजमध्ये दुष्काळाच्यास झळा सहन करणार्‍या शेतकर्‍यांसाठी ३ हजार ९२५ कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील ४ लाख १८ हजार ९१४ हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांपोटी २ लाख ९७ हजार २२१ शेतकर्‍यांना मदतीचा लाभ मिळेल.