शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख शेतक-यांना मिळणार मदतीचा आधार

By admin | Updated: December 12, 2014 01:25 IST

‘पॅकेज’ जाहीर झाल्याने जिल्ह्यातील शेतक-यांना दिलासा.

संतोष येलकर / अकोलाअत्यल्प पाऊस, हातून गेलेली पिके आणि नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांकडून सरकारी मदतीची प्रतीक्षा केली जात असतानाच, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी अखेर गुरुवारी राज्य सरकारमार्फत सात हजार कोटी रुपयांचे ह्यपॅकेज ह्णजाहीर करण्यात आले. सरकारी मदतीच्या या पॅकेजमध्ये जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त २ लाख ९७ हजार २२१ शेतकर्‍यांना मदतीचा आधार मिळणार आहे.यावर्षीच्या पावसाळय़ात तब्बल दीड महिना पावसाने मारलेली दांडी आणि त्यानंतर अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यात खरीप हंगामात मूग, उडिदाचे पीक शेतकर्‍यांच्या हातून गेले. दुबार-तिबार पेरणी करूनही अनेक भागात सोयाबीनचे पीक उगवले नाही. उगवलेल्या सोयाबीन पिकाचे एकरी ५0 किलो ते एक क्विंटलपर्यंत उत्पादन झाले. सोयाबीन सोबतच कपाशी पिकांच्या उत्पादनातही कमालीची घट झाली. रब्बी पिकांची पेरणी करण्यात आली; मात्र पावसाअभावी जमिनीतील ओल खोल खेल्याने, रब्बी पिकांचेही काही खरे नसल्याने नापिकीच्या परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. सर्वच पिकांचे उत्पादन बुडाल्याने, नापिकीच्या परिस्थितीत जिल्ह्यातील सातही तालुक्यातील सर्वच गावांची खरीप पिकांची सरासरी पैसेवारी केवळ ४१ पैसे आहे. त्यामुळे जिल्हय़ातील दुष्काळी परिस्थितीचे चित्र स्पष्ट झाले. यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण ४ लाख १८ हजार ९१४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली. त्यापैकी तब्बल ४ लाख १६ हजार ७९५ हेक्टर ९२ आर क्षेत्रावरील पिकांचे क्षेत्र बाधित झाले. त्यामध्ये जिरायती, बागायती आणि फळपिकांच्या क्षेत्राचा समावेश आहे. पिके हातून गेल्याने जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारकांसह जिल्ह्यातील २ लाख ९७ हजार २२१ शेतकर्‍यांना नापिकीचा फटका बसला. नापिकीमुळे दुष्काळी दुष्टचक्रात सापडल्याच्या स्थितीत सरकारकडून मदतीचा आधार केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा शेतकर्‍यांकडून केली जात असतानाच, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारकडून सात हजार कोटींचे ह्यपॅकेजह्ण जाहीर करण्यात आले. सरकारच्या या पॅकेजमध्ये दुष्काळाच्यास झळा सहन करणार्‍या शेतकर्‍यांसाठी ३ हजार ९२५ कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील ४ लाख १८ हजार ९१४ हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांपोटी २ लाख ९७ हजार २२१ शेतकर्‍यांना मदतीचा लाभ मिळेल.