शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

चरणगावात तीन गटांनी घेतली गावविकासाची शपथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:34 IST

पातूर : ग्रा. पं. निवडणुकीत पदांसाठी रस्सीखेच करताना तयार झालेले गट निवडणुकीनंतरही पाच वर्षे एकमेकांविरुद्ध लढत असतात, मात्र जनतेचा ...

पातूर : ग्रा. पं. निवडणुकीत पदांसाठी रस्सीखेच करताना तयार झालेले गट निवडणुकीनंतरही पाच वर्षे एकमेकांविरुद्ध लढत असतात, मात्र जनतेचा कौल स्वीकारून चरणगावचे तीनही गटांनी एकत्र येत गावविकासाठी नवा आदर्श घालून दिला आहे. उपसरपंच वैशाली दीपक इंगळे यांच्या पदभाराच्या दिवशी तिन्ही गटांनी एकत्रित येत गाव विकासाची शपथ घेतली.

पातूर तालुक्यात २३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि त्यानंतर सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी मित्र, काका-पुतणे, भाऊ- चुलत भाऊ तथा नात्यागोत्यातील अनेक सहकारी एकमेकांविरुद्ध उभे राहिले. कुठे कोणाचा पराभव झाला तर कुठे कुणाला यश प्राप्त झालं, असे असले तरी पातूर तालुक्यातील मात्र चरणगावच्या ग्रामपंचायतमध्ये गावकऱ्यांनी तीन गटांना कौल दिला. यात प्रामुख्याने जि. प. सदस्य विनोद देशमुख, माजी सभापती प्रमोद ऊर्फ पप्पू देशमुख आणि मुरलीधर क्षीरसागर, संताेष इंगळे, बाळकृष्ण वसतकार यांच्या नेतृत्वात लढलेल्या पॅनलची निवडणुकीत त्रिशंकू स्थिती चरणगाव येथे निर्माण झाली होती. सरपंच पदाची निवडणूक ही एकमेकाविरुद्ध लढली.

संपूर्ण जिल्ह्यामध्ये विकासासाठी एकत्रित येणारे गाव म्हणून चरणगावची विशेष ओळख आहे, हीच ओळख कायम ठेवण्यासाठी उपसरपंच पदाचा पदभार घेण्यासाठी वैशाली दीपक इंगळे यांनी पुढाकार घेतला. मुरलीधर क्षीरसागर, धनंजय देशमुख, सुमित्रा बाळकृष्ण वसतकार, पूजा धनंजय गाडेकर, मेघा प्रमोद देशमुख, अरुणा गजानन देशमुख, उत्तम विठ्ठल इंगळे, राजेश देविदास शिरसागर यांनी उपसरपंच वैशाली इंगळे यांना विकासासाठी बळ दिले. पदभाराचा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख, माजी सभापती पप्पू देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बाळकृष्ण वसतकार, संतोष शंकर इंगळे, दीपक इंगळे, प्रज्योत इंगळे, विलास इंगळे, सुनील इंगळे, पोलीस पाटील ज्ञानेश्वर पोरे, परसराम सुलताने, भास्कर सुलताने, विनोद नानाराव देशमुख, निलेश रामकृष्ण देशमुख, शैलेश देशमुख, राजेश देशमुख, निलेश विश्वनाथ इंगळे, राजेंद्र इंगळे, रेखाताई शिरसागर, भाविका रमेश शिंदे, अक्षय शिरसाट, ग्रामसेवक अशोक देवकते, तलाठी सुरेश घाटे यांची उपस्थिती हाेती. सूत्रसंचालन श्रीकृष्ण इंगळे यांनी केले.

.....................

गावकऱ्यांना केले आवाहन

राजकीय मतभेद विसरून पुढील निवडणुका येईपर्यंत गाव विकासासाठी एकत्रित यावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख, माजी सभापती पप्पू देशमुख व मुरलीधर शिरसागर या तीनही गटाच्या प्रमुखांनी गावकऱ्यांना केले.