शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
3
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
4
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
5
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
6
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
9
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
10
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
11
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
15
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन

चरणगावात तीन गटांनी घेतली गावविकासाची शपथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:34 IST

पातूर : ग्रा. पं. निवडणुकीत पदांसाठी रस्सीखेच करताना तयार झालेले गट निवडणुकीनंतरही पाच वर्षे एकमेकांविरुद्ध लढत असतात, मात्र जनतेचा ...

पातूर : ग्रा. पं. निवडणुकीत पदांसाठी रस्सीखेच करताना तयार झालेले गट निवडणुकीनंतरही पाच वर्षे एकमेकांविरुद्ध लढत असतात, मात्र जनतेचा कौल स्वीकारून चरणगावचे तीनही गटांनी एकत्र येत गावविकासाठी नवा आदर्श घालून दिला आहे. उपसरपंच वैशाली दीपक इंगळे यांच्या पदभाराच्या दिवशी तिन्ही गटांनी एकत्रित येत गाव विकासाची शपथ घेतली.

पातूर तालुक्यात २३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि त्यानंतर सरपंच उपसरपंच पदाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी मित्र, काका-पुतणे, भाऊ- चुलत भाऊ तथा नात्यागोत्यातील अनेक सहकारी एकमेकांविरुद्ध उभे राहिले. कुठे कोणाचा पराभव झाला तर कुठे कुणाला यश प्राप्त झालं, असे असले तरी पातूर तालुक्यातील मात्र चरणगावच्या ग्रामपंचायतमध्ये गावकऱ्यांनी तीन गटांना कौल दिला. यात प्रामुख्याने जि. प. सदस्य विनोद देशमुख, माजी सभापती प्रमोद ऊर्फ पप्पू देशमुख आणि मुरलीधर क्षीरसागर, संताेष इंगळे, बाळकृष्ण वसतकार यांच्या नेतृत्वात लढलेल्या पॅनलची निवडणुकीत त्रिशंकू स्थिती चरणगाव येथे निर्माण झाली होती. सरपंच पदाची निवडणूक ही एकमेकाविरुद्ध लढली.

संपूर्ण जिल्ह्यामध्ये विकासासाठी एकत्रित येणारे गाव म्हणून चरणगावची विशेष ओळख आहे, हीच ओळख कायम ठेवण्यासाठी उपसरपंच पदाचा पदभार घेण्यासाठी वैशाली दीपक इंगळे यांनी पुढाकार घेतला. मुरलीधर क्षीरसागर, धनंजय देशमुख, सुमित्रा बाळकृष्ण वसतकार, पूजा धनंजय गाडेकर, मेघा प्रमोद देशमुख, अरुणा गजानन देशमुख, उत्तम विठ्ठल इंगळे, राजेश देविदास शिरसागर यांनी उपसरपंच वैशाली इंगळे यांना विकासासाठी बळ दिले. पदभाराचा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख, माजी सभापती पप्पू देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बाळकृष्ण वसतकार, संतोष शंकर इंगळे, दीपक इंगळे, प्रज्योत इंगळे, विलास इंगळे, सुनील इंगळे, पोलीस पाटील ज्ञानेश्वर पोरे, परसराम सुलताने, भास्कर सुलताने, विनोद नानाराव देशमुख, निलेश रामकृष्ण देशमुख, शैलेश देशमुख, राजेश देशमुख, निलेश विश्वनाथ इंगळे, राजेंद्र इंगळे, रेखाताई शिरसागर, भाविका रमेश शिंदे, अक्षय शिरसाट, ग्रामसेवक अशोक देवकते, तलाठी सुरेश घाटे यांची उपस्थिती हाेती. सूत्रसंचालन श्रीकृष्ण इंगळे यांनी केले.

.....................

गावकऱ्यांना केले आवाहन

राजकीय मतभेद विसरून पुढील निवडणुका येईपर्यंत गाव विकासासाठी एकत्रित यावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य विनोद देशमुख, माजी सभापती पप्पू देशमुख व मुरलीधर शिरसागर या तीनही गटाच्या प्रमुखांनी गावकऱ्यांना केले.