शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

महिला सबलीकरणांतर्गत तिघींना मिळाली बागायती शेती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:14 IST

अडगाव बु. : समाजकल्याण विभागाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड महिला सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत तेल्हारा तालुक्यात अडगाव बु. येथील तीन ...

अडगाव बु. : समाजकल्याण विभागाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड महिला सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत तेल्हारा तालुक्यात अडगाव बु. येथील तीन महिलांना ६ जून रोजी बागायती शेतीचे वाटप करण्यात आले. यावेळी महिलांना, आपल्या नावाने सात-बारा होईल, जमीन मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. असे म्हणत, लाभार्थी महिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

समाजकल्याण विभागाच्यावतीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतील पात्र लाभार्थ्यांकरिता अडगाव बु. शेतशिवारात साडेपाच एकर बागायती शेती खरेदी करून जिल्हास्तरीय निवड समितीने निवड प्रक्रिया राबवून ईश्वर चिठ्ठीद्वारे तीन लाभार्थ्यांची निवड केली. त्यात एक परित्यक्ता व दोन विधवांचा समावेश आहे. परित्यक्ता भिमकन्या वसंत धाबे ०.८० आर, विधवा मंगला संतोष अंभोरे ०.८० आर व चंद्रकला भाऊराव सावळे ०.६० आर अशी शेतजमीन वाटप करण्यात आली.

ईश्वर चिठ्ठीने निवड झालेल्या लाभार्थींना सहायक आयुक्त समाजकल्याण अधिकारी पियुष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक सुसतकर, समाजकल्याण निरीक्षक उमा जोशी, कनिष्ठ लिपिक पराते, लांडगे यांच्याहस्ते आदेशाची प्रत देण्यात आली. समाजकल्याण विभागाच्यावतीने लाभार्थी महिलांना सदर शेतीची रितसर मोजणी करून त्यांना शेतीचा ताबा देण्यात आला.

यावेळी माजी सभापती गोपाल कोल्हे, मंगलसिंग डाबेराव, माजी उपसरपंच महेबुखॉ पठाण, मंडल अधिकारी नंदकिशोर पवार, पोलीस पाटील हितेश हागे, सामाजिक कार्यकर्ते महादेव सावळे उपस्थित होते.

फोटो:

ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यामुळे मिळाला लाभ

ग्रामपंचायतीने पाठविलेला प्रस्ताव व केलेल्या पाठपुराव्यामुळे आम्हाला लाभ मिळाल्याची भावना लाभार्थी महिलांनी व्यक्त केली. आम्ही शेतीचे मालक होऊ. आपल्या नावाने सात-बारा होईल, याचा कधी विचार केला नव्हता. परंतु शासनाच्या समाजकल्याण विभागातील योजनेमुळे आमचे आयुष्यच बदलून गेले, अशी भावना लाभार्थी भिमकन्या वसंत धाबे, मंगला संतोष अंभोरे, चंद्रकला भाऊराव सावळे यांनी व्यक्त केली.

अनुसूचित जातीतील दारिद्र्‌यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना उत्पन्न स्त्रोत उपलब्ध होऊन त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा, त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, याकरिता १०० टक्के अनुदानावर पात्र लाभार्थ्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत लाभ दिला जात आहे.

- उमा जोशी, समाजकल्याण निरीक्षक