शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

‘काटेपूर्णा’त तीन दिवसांचा जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2016 01:45 IST

आता मृत जलसाठा उपसावा लागणार!

अकोला : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पुरेसा पाऊस झाला नसल्याने धरणांची पातळी आता कमालीची खालावली असून, अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात केवळ १२ कोटी लिटर म्हणजे दोन ते तीन दिवसांचाच जलसाठा शिल्लक आहे. दमदार पाऊस न आल्यास मात्र धरणातील मृत जलसाठा उपसावा लागणार आहे. मागीलवर्षी या भागात कमी पाऊस झाल्याने धरणाच्या जलपातळीत वाढ झाली नव्हती. परिणामी, यावर्षी पाण्याचे वितरण तोलून मापून करावे लागले. यावर्षी पाऊस चांगला व दमदार होणार असल्याचे भाकीत भारतीय हवामान विभागाने वर्तविल्याने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या; परंतु पावसाळ्य़ाचे तीन आठवडे संपले तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरक पाऊस झाला नाही. परिणामी, धरणाची जलपातळी तळाला पोहोचली आहे. यावर्षी तापमान जास्त होते परिणामी बाष्पीभवनाचे प्रमाणही अधिक होते. काटेपूर्णा धरणात सध्या १२ कोटी लिटर पाणी शिल्लक आहे. अकोला शहराला झोननिहाय दररोज साडेपाच कोटी लिटर पाणी सोडण्यात येत आहे. या परिस्थितीप्रमाणे पाणी सोडल्यास हे शिल्लक पाणी केवळ दोन ते तीन दिवसच शहराला पुरेल, अशी स्थिती आहे. पाण्याचा होणारा अपव्यय, जलवाहिन्यांची गळती आदींची गोळाबेरीज केली, तर काटेपूर्णा धरणातील जिवंत जलसाठा दोन दिवस पुरेल, असे सांगत असले तरी कधी संपेल हे सांगता येत नाही. परिणामी मृत जलसाठय़ावरच अकोलेकरांची तहान भागवावी लागेल. मृत जलसाठा ११00 कोटी लिटर आहे. पण, धरणात पन्नास टक्क्य़ांपेक्षा अधिक गाळ असल्याने ५00 कोटी लिटरपर्यंत या धरणात मृत साठा असेल. संपूर्ण ५00 कोटी मृत जलसाठा उचलणे अशक्य असल्याने यातील दोनशे ते अडीचशे कोटी लिटर पाणी वापरता येईल.