शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘काटेपूर्णा’त तीन दिवसांचा जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2016 01:45 IST

आता मृत जलसाठा उपसावा लागणार!

अकोला : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पुरेसा पाऊस झाला नसल्याने धरणांची पातळी आता कमालीची खालावली असून, अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात केवळ १२ कोटी लिटर म्हणजे दोन ते तीन दिवसांचाच जलसाठा शिल्लक आहे. दमदार पाऊस न आल्यास मात्र धरणातील मृत जलसाठा उपसावा लागणार आहे. मागीलवर्षी या भागात कमी पाऊस झाल्याने धरणाच्या जलपातळीत वाढ झाली नव्हती. परिणामी, यावर्षी पाण्याचे वितरण तोलून मापून करावे लागले. यावर्षी पाऊस चांगला व दमदार होणार असल्याचे भाकीत भारतीय हवामान विभागाने वर्तविल्याने सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या; परंतु पावसाळ्य़ाचे तीन आठवडे संपले तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरक पाऊस झाला नाही. परिणामी, धरणाची जलपातळी तळाला पोहोचली आहे. यावर्षी तापमान जास्त होते परिणामी बाष्पीभवनाचे प्रमाणही अधिक होते. काटेपूर्णा धरणात सध्या १२ कोटी लिटर पाणी शिल्लक आहे. अकोला शहराला झोननिहाय दररोज साडेपाच कोटी लिटर पाणी सोडण्यात येत आहे. या परिस्थितीप्रमाणे पाणी सोडल्यास हे शिल्लक पाणी केवळ दोन ते तीन दिवसच शहराला पुरेल, अशी स्थिती आहे. पाण्याचा होणारा अपव्यय, जलवाहिन्यांची गळती आदींची गोळाबेरीज केली, तर काटेपूर्णा धरणातील जिवंत जलसाठा दोन दिवस पुरेल, असे सांगत असले तरी कधी संपेल हे सांगता येत नाही. परिणामी मृत जलसाठय़ावरच अकोलेकरांची तहान भागवावी लागेल. मृत जलसाठा ११00 कोटी लिटर आहे. पण, धरणात पन्नास टक्क्य़ांपेक्षा अधिक गाळ असल्याने ५00 कोटी लिटरपर्यंत या धरणात मृत साठा असेल. संपूर्ण ५00 कोटी मृत जलसाठा उचलणे अशक्य असल्याने यातील दोनशे ते अडीचशे कोटी लिटर पाणी वापरता येईल.