शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

किनखेड येथे आगीत तीन गोठे जळाले!

By admin | Updated: May 8, 2017 02:35 IST

तीन शेतक-यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान.

सायखेड : नजीकच्या किनखेड येथे ६ मे रोजी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत तीन गोठे भस्मसात झाले. या आगीत तीन शेतकर्‍यांचे शेतीपोयोगी साहित्य जळून तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.किनखेड येथील विश्‍वास रामचंद्र आंधळे, उमराव रामचंद्र आंधळे व बबन रामचंद्र आंधळे या तीन भावांचे शेती साहित्य व कुटार साठविण्यासाठी बांधलेले गोठे गावाला लागूनच आहेत. शनिवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गोठय़ात ठेवलेले २७0 स्प्रिंक्लर पाइपसह अन्य शेतीपोयोगी साहित्य जळाले. ही आग विझविण्यात अग्निशामक दलाला रात्री उशिरा यश आले. या आगीची माहिती मिळाल्यानंतर बाश्रीटाकळीचे तहसीलदार रवी काळे, निवासी नायब तहसीलदार अतुल पाटोळे, ठाणेदार सतीश पाटील, शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील धाबेकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. तहसीलदार रवी काळे व सुनील धाबेकर रात्रभर तेथेच थांबले होते. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गावातील पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेता कृषी पंपांचा वापर करणे गरजेचे होते; परंतु कृषी पंपांचा विद्युत पुरवठा रात्री बंद असल्याने अडचण येत होती. या बाबीची दखल घेऊन महान विद्युत वितरण केंद्राच्या अभियंत्यांनी गावठान फिडरचा विद्युत पुरवठा त्वरित बंद करून कृषी पंपांचा विद्युत पुरवठा सुरू केला. त्यामुळे शेतातील विहिरीवरील मोटारपंप सुरू झाल्याने त्यांचा आग विझविण्यासाठी वापर करता आला. या विहिरीतील पाणी संपताच अग्निशामक दलाची गाडी पोहोचल्याने आग विझविण्यात यश मिळाले.