शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

पैसे वाचवण्यासाठीच हजारो गावांना दुष्काळातून वगळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2016 02:57 IST

अकोला जिल्हय़ाच्या दौ-यात विखे पाटील यांचा युती शासनावर प्रहार.

अकोला: ग्रामीण भागात दुष्काळी कामावर पैसे खर्च होऊ नयेत, या हेतूनेच युती शासनाने गावाची आणेवारी कमीत कमी ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याने राज्यासह विदर्भातील हजारो गावांमध्ये दुष्काळ असतानाही तो जाहीर झाला नाही, अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण पाटील यांनी शुक्रवारी केली.दुष्काळी उपाययोजनांची समीक्षा व शेतकर्‍यांशी थेट संवाद साधण्यासाठी विखे पाटील ४ मार्च रोजी अकोला व वाशिम जिल्हय़ाच्या दौर्‍यावर आले होते. या दौर्‍यात त्यांनी अकोला जिल्हय़ातील गांधीग्राम, किनखेड, उगवाफटा, कापशी, पातूर तालुक्यातील बाभूळगाव आदी गावांना भेटी दिल्या. स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व शेतकर्‍यांशी त्यांनी याप्रसंगी संवाद साधला. शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. बाभूळगाव येथे एका सभेत बोलताना त्यांनी भाजपा - शिवसेना सरकारला शेतकर्‍यांप्रति अजिबात आस्था नाही. या परिस्थितीत सरकारने शेतकर्‍यासाठी तिजोरी खुली करायला हवी होती; परंतु हे सरकार तिजोरीतील पैसे कसे वाचतील याचाच विचार करण्यात व्यस्त आहे. मेक इंडिया, स्टॉर्टअप इंडिया यात महाराष्ट्रातील गोरगरीब, शेतकरी, सर्वसामान्यांना कुठेच स्थान नाही. त्यामुळे मेक इन, स्टॉर्ट अपच्या ऐवजी आता वाइंड अप अर्थात यांनाच गुंडाळण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. या सर्व पृष्ठभूमीवर आगामी अधिवेशनात काँग्रेस पक्ष सरकारला जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाभूळगाव येथे आयोजित सभेत प्रक ाश तायडे यांनी प्रास्ताविकातून जिल्हय़ातील दुष्काळ व शेतकर्‍यांची व्यथा मांडली. जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष हिदायत पटेल व माजी आमदार लक्ष्मण तायडे यांनी शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्या. दौर्‍यात विखे पाटील यांच्यासोबत आमदार अमित झनक, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, वाशिम जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष दिलीप सरनाईक, माजी आमदार लक्ष्मण तायडे, प्रा. अजहर हुसेन, दादाराव मते पाटील, डॉ. सुभाष कोरपे, प्रकाश तायडे, डॉ. सुधीर ढोणे, मनपातील विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण, राजेश भारती, उषा विरक, साधना गावंडे, सुभाष पाटील गावंडे, महेश गणगणे, अविनाश देशमुख, हेमंत देशमुख, कामगार सेलचे नेते बद्रुज्जमा, नगरसेवक अब्दुल जब्बार प्रामुख्याने उपस्थित होते.