शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

हजारो झाडांची राजरोस कत्तल, कारवाई शून्य

By admin | Updated: May 26, 2015 02:36 IST

बांधकाम विभाग, वनविभाग व महसूल विभाग हे तीनही विभागाचे दुर्लक्ष.

अकोला : रस्त्यालगत असलेल्या हजारो झाडांची दिवसाढवळ्या कत्तल करण्यात येत असून, याकडे शासनाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. बांधकाम विभाग, वनविभाग व महसूल विभाग हे तीनही विभाग याला जबाबदार असून, हजारो झाडांची कत्तल होऊनसुद्धा एकही तक्रार झाली नाही. तसेच कुणालाही शिक्षा झाली नाही. या प्रकाराला आळा घालण्याकडे कुणाचेही लक्ष नसल्यामुळे शेकडो झाडांची होणारी कत्तल रोखणार कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात वाढत असून, विविध आजारांचा प्रभाव वाढत आहे. हे रोखण्याकरिता वृक्ष लागवड करण्याची गरज असताना सर्रास वृक्षतोड करण्यात येत आहे. गत सात ते आठ वर्षांपूर्वी या विकृत मानसिकतेचा जन्म झाला. तेव्हापासून संपूर्ण विदर्भातील अनेक रस्त्यावर हजारो झाडांची कत्तल करण्यात आली व करण्यात येत आहे. ही कत्तल रोखण्याची प्राथमिक जबाबदारी बांधकाम विभागाची असली तरी वनविभाग व महसूल विभागही यामध्ये दखल घेऊन वृक्ष तोडणार्‍यांवर कारवाई करू शकतो. त्यासंबंधीची तक्रार देऊ शकते. मात्र, या तीनही विभागाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येते. रस्त्यालगत दोन्ही बाजूने शंभर ते दीडशे वर्षांंपूर्वी इंग्रजांनी कडूनिंब, बाभुळासह अन्य प्रजातींची झाडे लावली आहेत. मोठमोठी असलेली ही झाडे तोडण्यावर बांधकाम विभागाचे बंधन आहे. या झाडांच्या खोडांवर बांधकाम विभागाच्या वतीने लाल व पांढरा रंग देण्यात आला आहे. रस्त्यावरून नेहमीच वाहतूक होत असल्यामुळे ही झाडे कुर्‍हाडीने तोडणे शक्य होत नाही. त्यामुळे नवीन शक्कल लढविण्यात आली. झाडाच्या बुंध्याशी विस्तव टाकण्यात येतो. हळूहळू विस्तव पेटत जातो व झाडही पेटते. त्यानंतर झाड बुडातून पूर्ण त: जळाल्यानंतर कोसळते. झाड पडल्यावर रात्रीच्या सुमारास झाडाच्या फांद्या तोडण्यात येतात व त्या लं पास केल्या जातात. त्यानंतर दुसर्‍या रात्री खोड तोडून नेण्यात येते. दोन ते तीन दिवस हा कार्यक्रम सुरू असतो. मात्र, याकडे कुणाचेही लक्ष जात नाही. बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करतो तर, वनविभागही बांधकाम विभागाकडे बोट दाखवितो.