शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

अस्वच्छता जैसे थे!

By admin | Updated: September 26, 2014 02:00 IST

अकोला शहरातील स्वच्छतेसाठी पुन्हा हेल्पलाईनची घोषणा.

अकोला : अस्वच्छता व साफसफाईअभावी संपूर्ण शहरात साथ रोगांचा फैलाव झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी राखणे महापालिकेचे कर्तव्य असताना, वरिष्ठ अधिकार्‍यांनी झोपेचे सोंग घेतल्याची विदारक परिस्थिती आहे. अकोलेकरांचा जीव धोक्यात सापडल्याच्या वृत्तानं तर मनपा प्रशासनाने थातूरमातूर हेल्पलाईन सुरू केली असून, २४ स्वच्छता निरीक्षकांचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आले. स्वच्छतेच्या मुद्यावर प्रशासनाची एकूणच भूमिका लक्षात घेता, कागदोपत्री घोषणाबाजी केल्याचे दिसून येते. शहरात दैनंदिन साफसफाई करण्याची नैतिक जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. पडीत २0 प्रभागातील स्वच्छतेसाठी तब्बल ६00 खासगी कर्मचारी तर उर्वरित १६ प्रभागांसाठी ७00 सफाई कर्मचार्‍यांची प्रशासनाने नियुक्ती केली. अर्थातच, मुख्य रस्ते, प्रभागातील प्रत्येक गल्ली बोळासह सव्र्हीस लाईन व सार्वजनिक जागेच्या स्वच्छतेसाठी चक्क १ हजार ३00 सफाई कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय कचरा उचलण्याचा कंत्राट खासगी संस्थेला देण्यात आला असून, याकरिता १८ ट्रॅक्टरद्वारे दररोज कचरा उचलल्या जात असल्याचा दावा कंत्राटदारासह महा पालिकादेखील करते. अर्थातच, या बदल्यात संबंधित कंत्राटदाराचे देयक अदा केल्या जात आहे. निव्वळ कचरा व साफसफाईच्या विषयावर कोट्यवधींचा खर्च होत असला तरी स्वच्छतेच्या नावाने बोंब आहे. परिणामी अकोल्यात कावीळ, हिवताप व डेंग्यूसारख्या गंभीर साथ रोगांनी थैमान घातले. हा मुद्दा ह्यलोकमतह्णने चव्हाट्यावर आणल्यानंतर झोपेतून जागे झालेल्या प्रशासनाने वैद्यकीय अधिकारी, साथ रोग अधिकारी, हिवताप अधिकारी, आरोग्य अधिकार्‍यांची बैठक घेतली. अकोलेकरांसाठी संपूर्ण २७ स्वच्छता निरीक्षकांचे भ्रमणध्वनी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.