शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

दहा वर्षात ४८ लाख कुशल मनुष्यबळाचा तुटवडा भासणार!

By admin | Updated: April 29, 2016 02:07 IST

शिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज; संजय खडक्कार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

अकोला: सध्या केंद्र आणि राज्य सरकारने कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर दिला आहे. महाराष्ट्रातही मोठय़ा प्रमाणावर कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जात आहे; मात्र प्रत्यक्षात सध्याची शिक्षण पद्धती बघता आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्मिती करणे अशक्य असल्याचे दिसते. पुढील दहा वर्षांत लागणारे आवश्यक मनुष्यबळ आणि प्रत्यक्षात तयार होणारे मनुष्यबळ यातील तफावत बघता ४८ लाख कुशल कामगारांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. याकडे विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. डॉ. खडक्कार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात कुशल मनुष्यबळ निर्मितीबाबत गांभीर्याने विचार करण्याची विनंती केली आहे. राज्यातील सध्याच्या कौशल्य विकास शिक्षण पद्धतीत त्यासाठी आवश्यक बदल करण्याबाबत काही सूचनाही त्यांनी या पत्रातून केल्या आहेत. जगात सर्वात कमी कुशल मनुष्यबळ भारतात आहे. जगात चीनमध्ये ४८ टक्के, अमेरिकेकडे ५८ टक्के,र्जमनीत ७0 टक्के, कोरियात ९६ टक्के आणि ब्रिटनमध्ये ६८ टक्के कुशल मनुष्यबळ आहे. भारतात मात्र एकीकडे सर्वाधिक मनुष्यबळ उपलब्ध असलेला देश असतानाही अकुशल मनुष्यबळाचाच त्यात अधिक भरणा असल्याने विकासात येणार्‍या अडचणीबाबतही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यासाठी कौशल्य विकास करणार्‍या शिक्षण पद्धतीवर भर द्यावा लागेल, असे डॉ. खडक्कार यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्या एका अहवालानुसार महाराष्ट्रात पुढील दहा वर्षांमध्ये १.५ कोटी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. प्रचलित शिक्षणपद्धतीचा विचार केल्यास या काळात राज्यातील विद्यापीठांमधून १ कोटी कुशल मनुष्यबळ निर्माण होईल. उर्वरित ४८ लाख मनुष्यबळ निर्मितीचे आव्हान महाराष्ट्र सरकारपुढे राहील. हा तुडवडा कसा भरून काढता येईल, याबाबत आतापासूनच सरकारने विचार करणे आवश्यक आहे. देशात उच्च शिक्षण देणार्‍या राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे २0१0 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात नमूद आहे.