शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
3
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
4
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
5
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
6
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
7
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
9
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
10
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
11
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
12
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
13
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
14
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
15
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
16
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
17
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
18
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
19
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

दहा वर्षात ४८ लाख कुशल मनुष्यबळाचा तुटवडा भासणार!

By admin | Updated: April 29, 2016 02:07 IST

शिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज; संजय खडक्कार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

अकोला: सध्या केंद्र आणि राज्य सरकारने कुशल मनुष्यबळ निर्मितीवर भर दिला आहे. महाराष्ट्रातही मोठय़ा प्रमाणावर कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जात आहे; मात्र प्रत्यक्षात सध्याची शिक्षण पद्धती बघता आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्मिती करणे अशक्य असल्याचे दिसते. पुढील दहा वर्षांत लागणारे आवश्यक मनुष्यबळ आणि प्रत्यक्षात तयार होणारे मनुष्यबळ यातील तफावत बघता ४८ लाख कुशल कामगारांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. याकडे विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. डॉ. खडक्कार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात कुशल मनुष्यबळ निर्मितीबाबत गांभीर्याने विचार करण्याची विनंती केली आहे. राज्यातील सध्याच्या कौशल्य विकास शिक्षण पद्धतीत त्यासाठी आवश्यक बदल करण्याबाबत काही सूचनाही त्यांनी या पत्रातून केल्या आहेत. जगात सर्वात कमी कुशल मनुष्यबळ भारतात आहे. जगात चीनमध्ये ४८ टक्के, अमेरिकेकडे ५८ टक्के,र्जमनीत ७0 टक्के, कोरियात ९६ टक्के आणि ब्रिटनमध्ये ६८ टक्के कुशल मनुष्यबळ आहे. भारतात मात्र एकीकडे सर्वाधिक मनुष्यबळ उपलब्ध असलेला देश असतानाही अकुशल मनुष्यबळाचाच त्यात अधिक भरणा असल्याने विकासात येणार्‍या अडचणीबाबतही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यासाठी कौशल्य विकास करणार्‍या शिक्षण पद्धतीवर भर द्यावा लागेल, असे डॉ. खडक्कार यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्या एका अहवालानुसार महाराष्ट्रात पुढील दहा वर्षांमध्ये १.५ कोटी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. प्रचलित शिक्षणपद्धतीचा विचार केल्यास या काळात राज्यातील विद्यापीठांमधून १ कोटी कुशल मनुष्यबळ निर्माण होईल. उर्वरित ४८ लाख मनुष्यबळ निर्मितीचे आव्हान महाराष्ट्र सरकारपुढे राहील. हा तुडवडा कसा भरून काढता येईल, याबाबत आतापासूनच सरकारने विचार करणे आवश्यक आहे. देशात उच्च शिक्षण देणार्‍या राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे २0१0 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात नमूद आहे.