शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

टिकली पेक्षा शेतकरी विधवांच्या पुसलेल्या कुंकवावर चर्चा व्हावी - अरविंद जगताप

By atul.jaiswal | Updated: November 5, 2022 19:48 IST

कोणी टिकली लावावी किंवा लावू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न असताना त्या मुद्यावर माध्यमांमध्ये नाहक चर्चा होत आहे.

स्व.बाजीराव पाटील साहित्यनगरी (अकोला) : कोणी टिकली लावावी किंवा लावू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न असताना त्या मुद्यावर माध्यमांमध्ये नाहक चर्चा होत आहे. विदर्भ-मराठवाड्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या पत्नींच्या कपाळावरील कुंकु कायमचे पुसले गेले आहे, अशा संवेदनशिल मुद्यांवर चर्चा व्हायला हवी असताना टीकलीसारख्या निरर्थक विषयांना महत्व दिले जात असल्याचा संताप लेखक, दिग्दर्शक अरविंद जगताप यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.

विदर्भ साहित्य संघ, अकोला शाखेद्वारे आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.वाशिम मार्गावरील प्रभात किड्स स्कुलच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्व. बाजीराव पाटील साहित्यनगरीत दोन दिवसीय राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनास शनिवारी (दि.५ नोव्हेंबर) थाटात सुरुवात झाली. स्व. विशाल डिक्कर स्मृती साहित्यपीठात उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. मंचावर संमेलनाध्यक्ष अरविंद जगताप, उद्घाटक युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक ऐश्वर्य पाटेकर, प्रमुख अतिथी म्हणून आमदार रणधीर सावरकर, अमरावती विभागीय आयुक्त तथा साहित्यीक दिलीप पांढरपट्टे, स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, सरचिटणीस विलास मानेकर, आमंत्रक डॉ. रविंद्र शोभने, अकोला शाखेचे अध्यक्ष विजय कौसल, संमेलन सरचिटणीस अशोक डेरे, मुख्य कार्यवाह डॉ. गजानन नारे, समन्वयक सीमा शेटे (रोठे), संमेलन चिटणीस प्रा.डॉ. सुहास उगले, सहकार्यवाह डॉ. विनय दांदळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना अरविंद जगताप म्हणाले की, अलीकडच्या काळात बोलणे कमी होत आहे. प्रश्न विचारणे कमी होत आहे. त्याची जागा आता निरर्थक चर्चांनी घेतली आहे. समाजमाध्यमांवर नाहक चर्चा करताना आपल्याला कुंकु पुसल्या गेलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचे दुख: दिसत नाही, हा निर्लज्जपणाचा कळस आहे, असे जगताप म्हणाले. यावेळी त्यांनी राजकीय नेते व त्यांच्या समर्थकांनाही चांगल्याच कानपिचक्या दिल्या. सर्वच पक्षाचे नेते एकत्र येतात मात्र त्यांचे समर्थक परस्परात भांडतात. कोणताही नेता आपल्या समर्थकाला खांद्यावर घेत नाही. त्यामुळे समर्थकांनी नेत्यांच्या दावणीला बांधल्यासारखे वागू नये, असेही जगताप म्हणाले.

उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ. गजानन नारे यांनी केले. यावेळी रविंद्र शोभने, स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे, प्रमुख अतिथी रणधीर सावरकर, प्रदीप दाते, दिलीप पांढरपट्टे यांनीही मनोगत व्यक्त केले. सीमा शेटे यांनी शुभेच्छा संदेशांचे वाचन केले. संचालन ॲड. वल्लभ नारे, तर आभार प्रदर्शन विजय कौसल यांनी केले.

टॅग्स :Akolaअकोला