शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

टिकली पेक्षा शेतकरी विधवांच्या पुसलेल्या कुंकवावर चर्चा व्हावी - अरविंद जगताप

By atul.jaiswal | Updated: November 5, 2022 19:48 IST

कोणी टिकली लावावी किंवा लावू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न असताना त्या मुद्यावर माध्यमांमध्ये नाहक चर्चा होत आहे.

स्व.बाजीराव पाटील साहित्यनगरी (अकोला) : कोणी टिकली लावावी किंवा लावू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न असताना त्या मुद्यावर माध्यमांमध्ये नाहक चर्चा होत आहे. विदर्भ-मराठवाड्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या पत्नींच्या कपाळावरील कुंकु कायमचे पुसले गेले आहे, अशा संवेदनशिल मुद्यांवर चर्चा व्हायला हवी असताना टीकलीसारख्या निरर्थक विषयांना महत्व दिले जात असल्याचा संताप लेखक, दिग्दर्शक अरविंद जगताप यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.

विदर्भ साहित्य संघ, अकोला शाखेद्वारे आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.वाशिम मार्गावरील प्रभात किड्स स्कुलच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्व. बाजीराव पाटील साहित्यनगरीत दोन दिवसीय राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनास शनिवारी (दि.५ नोव्हेंबर) थाटात सुरुवात झाली. स्व. विशाल डिक्कर स्मृती साहित्यपीठात उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. मंचावर संमेलनाध्यक्ष अरविंद जगताप, उद्घाटक युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक ऐश्वर्य पाटेकर, प्रमुख अतिथी म्हणून आमदार रणधीर सावरकर, अमरावती विभागीय आयुक्त तथा साहित्यीक दिलीप पांढरपट्टे, स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, सरचिटणीस विलास मानेकर, आमंत्रक डॉ. रविंद्र शोभने, अकोला शाखेचे अध्यक्ष विजय कौसल, संमेलन सरचिटणीस अशोक डेरे, मुख्य कार्यवाह डॉ. गजानन नारे, समन्वयक सीमा शेटे (रोठे), संमेलन चिटणीस प्रा.डॉ. सुहास उगले, सहकार्यवाह डॉ. विनय दांदळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना अरविंद जगताप म्हणाले की, अलीकडच्या काळात बोलणे कमी होत आहे. प्रश्न विचारणे कमी होत आहे. त्याची जागा आता निरर्थक चर्चांनी घेतली आहे. समाजमाध्यमांवर नाहक चर्चा करताना आपल्याला कुंकु पुसल्या गेलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचे दुख: दिसत नाही, हा निर्लज्जपणाचा कळस आहे, असे जगताप म्हणाले. यावेळी त्यांनी राजकीय नेते व त्यांच्या समर्थकांनाही चांगल्याच कानपिचक्या दिल्या. सर्वच पक्षाचे नेते एकत्र येतात मात्र त्यांचे समर्थक परस्परात भांडतात. कोणताही नेता आपल्या समर्थकाला खांद्यावर घेत नाही. त्यामुळे समर्थकांनी नेत्यांच्या दावणीला बांधल्यासारखे वागू नये, असेही जगताप म्हणाले.

उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ. गजानन नारे यांनी केले. यावेळी रविंद्र शोभने, स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे, प्रमुख अतिथी रणधीर सावरकर, प्रदीप दाते, दिलीप पांढरपट्टे यांनीही मनोगत व्यक्त केले. सीमा शेटे यांनी शुभेच्छा संदेशांचे वाचन केले. संचालन ॲड. वल्लभ नारे, तर आभार प्रदर्शन विजय कौसल यांनी केले.

टॅग्स :Akolaअकोला