शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

विवेकी समाजनिर्मितीचे वातावरण हवे

By admin | Updated: January 12, 2015 01:55 IST

मुक्ता दाभोळकरांनी व्यक्त केली अपेक्षा.

बुलडाणा : विज्ञानवादाचा प्रसार प्रचार हा शिक्षणातुन होतो व शिक्षणातुन विवेकी समाज निर्माण होतो. मात्र अशा समाजव्यवस्थेला संरक्षण देणारा, विध्वसंक ऐवजी विधायक कार्याकडे वळविण्यासाठी असलेले सामाजीक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सर्वाची असली तरी सरकारनेही तसे वातावरण जाणीवपुर्वक निर्माण होईल याची काळजी घेतली पाहिजे. अविवेकी विचार किंवा प्रतिगामी शक्ती डोके वर काढत असतील तर विज्ञानवादी समाजव्यवस्थेसाठी ते घातक ठरेल अशी भुमिका महाराष्ट्र अंधङ्म्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर यांनी मांडली. स्थानिक विङ्म्रामगृहावर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सध्या राज्यभरात महात्मा गांधी यांची हत्या करणार्‍या नथुरामची जयंती साजरी होऊ लागली आहे. नथुराम किती देशभक्त होता याची माहिती सोशल मिडीयामधून जाणीवपुर्वक पसरवली जात आहे. अशा प्रवृत्तींना पाठबळ मिळणे घातक आहे. त्यामुळे पुरोगामी चळवळींना अधिक जोमाने काम करावे लागले अशा त्या म्हणाल्या. डॉ.दाभोळकरांनी महाराष्ट्र अनिसची केलेली बांधणी ही भक्कम अशा विचारांवर आधारीत आहे त्यामुळे त्यांच्यानंतरही संघटनेचे काम त्याच वेगाने सुरू असुन अनेक पातळीवर संघटना वाढली असल्याचा दावा त्यांनी केला. विवेक वाहिनीच्या द्वारे तरुणांना कृतीयुक्त कार्यक्रम देण्याचे काम केले जात असल्याने युवकांचा ओढा संघटनेकडे वाढला आहे येणार्‍या काळात विवेक वाहिनीच्या कार्याचा विस्तार प्रत्येक महाविद्यालयाच्या स्तरावर करण्याचा मनोदय त्यांनी बोलुन दाखविला. यावेळी संघटनेच्या राजय कार्यवाह प्राचार्या डॉ.सविता शेटे, नरेंद्र लांजेवार उपस्थित होते.

*दर्गा परिसरात मानसोपचार केंद्र हवे

महाराष्ट्र अनिस च्यामाध्यमातुन चाळीसगाव परिसरातील एका दग्र्याजवळ मानसोपचार केंद्र सुरू केले असुन अंधङ्म्रद्धेला पायबंद घालण्यासाठी मानसमित्र ही संकल्पना रूजविली आहे. बुलडाण्यातील सैलानी परिसरातही असे मानसोपचार केंद्र व्हावे व याभागातील तरूणांनी मानसमित्र होऊन अंधङ्म्रद्धा निर्मुलनाच्या कामात पुढकार घ्यावा अशी अपेक्षा मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केली.

*हत्येच्या तपासावर समाधानी नाही

डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास ज्या पद्धतीने सुरू आहे त्याबाबत आपण समाधानी नाही. त्यांची हत्या नियोजनपुर्वक केली आहे. ते हत्यारे समाजासमोर येणे गरजेचे आहे कारण ती हत्या विचारांची हत्या आहे. नव्या सरकारकडून वेगाने तपासाची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले.