शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
5
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
7
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
8
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
9
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
10
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
11
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
12
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
13
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
14
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
15
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
16
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
17
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
18
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
19
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
20
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?

अर्थसंकल्पात कृषीसाठी ठोस तरतूदच नाही!

By admin | Updated: March 15, 2016 02:14 IST

कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक विजय जावंधिया यांचे प्रतिपादन.

दादाराव गायकवाड / कारंजा लाड (जि. वाशिम)भारत हा कृषिप्रधान देश आहे; परंतु या देशाच्या वार्षिक अर्थसंकल्पात कृषी विकासासाठी ठोस अशी तरतूदच करण्यात येत नाही, असे मत शेती अर्थशास्त्राचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी लोकमतशी संवाद साधताना व्यक्त केले. युवा शेतकरी परिषदेच्या निमित्ताने विजय जावंधिया कारंजा येथे आले असता लोकमतने त्यांच्याशी कृषी अर्थशास्त्र आणि सरकारचे धोरण या विषयावर संवाद साधला.प्रश्न: शेतकर्‍यांना कृषी मालाचे योग्य भाव मिळण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप आवश्यक आहे काय? -शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी बाजार व्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप असायलाच हवा; तसेच शासनाने शेतकर्‍यांना कृषी मालावर सबसिडीच्या माध्यमातून मदत करायला हवी.प्रश्न: शेतकर्‍यांना स्वत:च्या मालाचे भाव निश्‍चित करण्याचा अधिकार असायला हवा काय?-या जगात प्रत्येक व्यापार्‍याला किंवा विक्रेत्याला जर त्याच्या वस्तूचे किंवा मालाचे भाव स्वत: निश्‍चित करण्याच्या अधिकार असेल, तर शेतकर्‍यांनाही त्याच्या मालाचे भाव निश्‍चित करण्याचा अधिकार असायलाच हवा.प्रश्न: सवरेदयची विचारधारा आधुनिक युगात कितपत लागू पडते? -भूदान चळवळीला गावागावापर्यंत घेऊन जावे लागेल. कार्यकर्त्यांची संख्या वाढवावी लागेल. भूदानचे महत्त्व, त्याचे फायदे गावकर्‍यांना समजावून सांगावे लागतील. भूदान चळवळीचे महत्त्व नव्या पिढीला आधुनिक युगात कसे महत्त्वाचे आहे, हे सांगावे लागेल. प्रश्न: सध्याच्या सरकारचे धोरण शेतकरीविरोधी आणि उद्योगधाजिर्ने आहे काय?-होय, भारताच्या विद्यमान सरकारचे धोरण हे शेतकर्‍यांच्या विरोधात असून, हे सरकार उद्योगधजिर्णे असल्याचे माझे स्पष्ट मत आहे. प्रश्न: मानोरा तालुक्यातील जामदराच्या शेतकर्‍यांनी खरीप हंगामावर बहिष्कार टाकला. याबाबत काय म्हणाल?शेतकर्‍यांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी आंदोलनाचा हा प्रकार निश्‍चित चांगला असून, जामदराच्या शेतकर्‍यांचे यासाठी मी सर्मथन करतो. प्रश्न: शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा फायदा बँकांना होतो, शेतकर्‍यांना नाही, सरकारच्या या दाव्यात तथ्य आहे काय?-सरकारचा हा युक्तिवाद पूर्णपणे चुकीचा आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याची त्यांची मुळीच इच्छा नाही. मनमोहनसिंग सरकारने शेतकर्‍यांना २ हजार कोटींची कर्ज माफी दिली होती. त्यामुळे शेकडो शेतकर्‍यांना फायदा झाला होता. प्रश्न: विजय मल्ल्यांनी काँग्रेसच्या काळात कर्ज घेतल्याच्या सरकारच्या युक्तिवादाबाबत काय म्हणाल?-विजय मल्ल्या यांनी काँग्रेसच्या काळात कर्ज घेतले असले तरी, त्यांनी पलायन भाजप सरकारच्या काळात केले आहे. त्यांनी मल्ल्यांना पलायन कसे करू दिले, याचे उत्तर प्रथम द्यावे.