शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्यात समाजाला बदलण्याची ताकद"

By संतोष येलकर | Updated: February 25, 2024 15:24 IST

राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन

अकोला : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता आणि त्यांच्या साहित्यात समाजाला बदलण्याची ताकद आहे, असे प्रतिपादन नागपूर येथील राष्ट्रसंत साहित्याचे अभ्यासक तथा दहाव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रक्षक यांनी शनिवारी सायंकाळी येथे केले. राष्ट्रसंत सेवा समिती व राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन आयोजन समितीच्या वतीने अकोला शहरातील रिंग रोडस्थित जानोरकर मंगल कार्यालय येथे आयोजित दहाव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. मुख्य मार्गदर्शक आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या हस्ते दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी स्वागताध्यक्ष कपिल ढोके, डाॅ. ममता इंगोले, गुणवंत जानोरकर, डाॅ. गजानन नारे, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, अरविंद तिडके, अरविंद देठे, गाेवर्धन खवले, डाॅ. मानकर, सुधा जंजाळ, डाॅ. रामेश्वर बरगट, ॲड. संतोष भोरे, गजानन झटाले, विवेक पारसकर, पंकज जायले, आदी प्रबोधन विचारपीठावर उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हयातीतच त्यांचे साहित्य जनसामान्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले, असे सांगत ज्या गावात एसटी पोहोचली त्या गावात ‘ग्रामगीता ’ पोहोचली नाही, हे दु:ख असल्याचे रक्षक म्हणाले. भगवी टोपी घालणे म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मानतो, असे नसून राष्ट्रसंतांचे विचार प्रत्यक्ष जीवनात उतरवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. अकोल्यात होणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आता जिल्ह्यातील तालुक्यापर्यंत पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. रामेश्वर बरगट यांनी केले. संचालन सचिन माहोकार यांनी, तर आभारप्रदर्शन शेखर साबळे यांनी केले. सामुदायिक प्रार्थनेने संमेलनाच्या उद्घाटन सत्राचा समारोप करण्यात आला.संमेलनातून साहित्याचा प्रचार करण्याचा संकल्प करा : आचार्य वेरुळकर गुरुजी

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनातून राष्ट्रसंतांच्या साहित्याचा प्रचार करण्याचा संकल्प करून संमेलन कृतीत उतरवले पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाचे मुख्य मार्गदर्शक आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी उद्घाटनपर भाषणात केले. सभा आणि संमेलन यामधील फरक स्पष्ट करीत, जे साहित्य लोकांना अंधश्रद्धेतून बाहेर काढते, विचार करण्यासाठी प्रवृत्त करते, ते खरे साहित्य असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :AkolaअकोलाMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन