शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा जनतेला आला उबग !

By संतोष येलकर | Updated: July 16, 2023 16:49 IST

अनिल देशमुख यांचा आरोप : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार

अकोला : गेल्या सव्वा वर्षापासून राज्यात सुरू असलेल्या भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा महाराष्ट्रातील जनतेला उबग आला आहे, असा आरोप करीत, आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी येथे केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अकोला जिल्हा शाखेच्यावतीने आयोजित आढावा बैठकीनंतर शहरातील जानोरकर मंगल कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यात महागाई, बेरोजगारी, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण असे अनेक प्रश्न असताना, भाजपकडून सुरू असलेल्या केवळ फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला. राज्यातील या सरकारमधील मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर सर्वात जास्त अस्वस्थता भाजपच्या आमदारांमध्ये असून, शिवसेना शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रिपदाची प्रतीक्षा असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव गावंडे, डाॅ. संतोष कोरपे, रमेश हिंगणकर, अॅड. सुहास तिडके, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, डाॅ.आशा मिरगे, दिलीप आसरे आदी उपस्थित होते.

कायदेशीररीत्या शरद पवारच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना विचारात घेता, कायदेशीररीत्या शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेच आहेत. असे सांगत अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्षाचे कार्यकर्ते शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचा दावादेखील देशमुख यांनी यावेळी केला.