शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील आराेग्य व्यवस्था काेलमडली

By सचिन राऊत | Updated: November 24, 2023 18:27 IST

राष्ट्रीय आराेग्य अभियान कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनाचा परिणाम

अकाेला : राष्ट्रीय आराेग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गत एक महिन्यापासून कामबंद आंदाेलन सुरू केले असून या आंदाेलनाचे गंभीर परिणाम आता आराेग्य सेवेवर जाणवत असल्याचे वास्तव जिल्ह्यात दिसून येत आहे. महत्वाच्या शस्त्रक्रिया, आयुष्यमान कार्ड, गाेल्डन कार्ड, लसीकरण यासह विविध आराेग्य सेवेत कार्यरत असलेल्या ८०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतल्याने आराेग्य सेवा पूर्णता काेलमडल्याने चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.

शासनाच्या आराेग्य विभागातील रिक्त पदांवर समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर गत एक महिन्यापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

आंदाेलनस्थळी एनएचएमच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. त्यानंतर कॅन्डल मार्च काढण्यात आला. अशाेक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वारकरी दिंडी काढण्यात आली. त्यानंतर रांगाेळी काढून काळी दिवाळी साजरी करण्यात आली. मात्र शासन व प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्याने आता आराेग्य सेवेचे कामकाजही बंद असल्याने ग्रामीण भागात आराेग्य व्यवस्था पूर्णता काेलमडल्याचे चित्र आहे. या आंदोलनात ८०० पेक्षा अधिक कंत्राटी अधिकारी-कर्मचारी सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी परिचारिका, जीएनएम एलएचव्ही, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व एनएचएम अंतर्गत कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर समायोजन करण्याबाबत शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे.

याची दखल न घेतल्याने २५ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय आराेग्य अभियानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या आंदाेलनाला आराेग्य संस्थांचा पाठिंबा मिळत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :AkolaअकोलाStrikeसंप