बोरगाव मंजू: येथील शहीद स्व. यशवंत आनंदराव देशमुख यांच्या स्मरणार्थ बांधण्यात येणार्या सामाजिक सभागृहाच्या बांधकामात ठाणेदार भास्कर तंवर हे अडथळा निर्माण करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांना सोमवारी दिलेल्या तक्रारीत केला आहे. शहीद स्व. यशवंत आनंदराव देशमुख यांच्या स्मरणार्थ सामाजिक सभागृह बांधण्यासाठी १३ मार्च २0१५ रोजी १0 लाख रुपये मंजूर करण्यात आले. राष्ट्रीय महामार्गाला लागून सभागृह बांधण्यात येणार आहे. १२ फेब्रुवारी २0१६ रोजी सभागृह बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. १८ फेब्रुवारी रोजी बांधकामाला प्रारंभ झाला. काही वेळाने ठाणेदार तंवर हे ८ ते १0 कर्मचार्यांसह घटनास्थळावर आले. त्यांनी कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप संतोष भीमराव देशमुख यांनी तक्रारीत केला आहे. त्यांना शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा अधिकार नसून, ते अशांतता निर्माण करीत असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. याबाबत त्यांनी कारवाईची मागणीही केली आहे. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार रणधीर सावरकर व उपविभागीय अधिकार्यांना पाठविण्यात आली आहे.
बांधकामात ठाणेदारांचा अडथळा!
By admin | Updated: February 24, 2016 01:49 IST